शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

टंचाईकडे यंत्रणेचे दुर्लक्ष, गोदामातून आणावे लागते पाणी, आदिवासींची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:59 IST

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीसमस्येकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोनगावाजवळील या पाड्यात पाणीपुरवठा विभाग व कोन ग्रामपंचायतीच्या वतीने बोअरवेल व विहीरही बांधलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण, तर कोनगावाजवळील गोदामातील कामगारांसाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागतो. मुळात या पाड्यात सरकारच्या कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’, ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग तालुक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करत आहे. येथील आदिवासी, कष्टकरी समाजबांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. येथील अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते, याला काय म्हणायचे, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तर, भिवंडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्यांनी पाणीटंचाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणीटंचाईकडे कधी लक्ष देणार, अन्यथा आम्हालाच पंचायत समितीवर हंडे घेऊन धडक मारावी लागेल, असा इशारा अनिता वाघ या कार्यकर्तीने केला आहे. हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून सदस्यांनी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या पाड्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ती दूर न केल्यास पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू. - गणपत हिलम, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, कातकरी घटक

या पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी याकडे लक्ष दिले आहे. - व्ही.डी. धोंडगे, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई