शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

टंचाईकडे यंत्रणेचे दुर्लक्ष, गोदामातून आणावे लागते पाणी, आदिवासींची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:59 IST

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीसमस्येकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोनगावाजवळील या पाड्यात पाणीपुरवठा विभाग व कोन ग्रामपंचायतीच्या वतीने बोअरवेल व विहीरही बांधलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण, तर कोनगावाजवळील गोदामातील कामगारांसाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागतो. मुळात या पाड्यात सरकारच्या कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’, ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग तालुक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करत आहे. येथील आदिवासी, कष्टकरी समाजबांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. येथील अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते, याला काय म्हणायचे, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तर, भिवंडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्यांनी पाणीटंचाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणीटंचाईकडे कधी लक्ष देणार, अन्यथा आम्हालाच पंचायत समितीवर हंडे घेऊन धडक मारावी लागेल, असा इशारा अनिता वाघ या कार्यकर्तीने केला आहे. हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून सदस्यांनी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या पाड्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ती दूर न केल्यास पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू. - गणपत हिलम, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, कातकरी घटक

या पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी याकडे लक्ष दिले आहे. - व्ही.डी. धोंडगे, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई