शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईकडे यंत्रणेचे दुर्लक्ष, गोदामातून आणावे लागते पाणी, आदिवासींची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:59 IST

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तरीचापाडा या आदिवासीपाड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीसमस्येकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने दरवर्षी या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोनगावाजवळील या पाड्यात पाणीपुरवठा विभाग व कोन ग्रामपंचायतीच्या वतीने बोअरवेल व विहीरही बांधलेली नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्यासाठी कधी कल्याण, तर कोनगावाजवळील गोदामातील कामगारांसाठी असलेल्या नळाचा आधार घ्यावा लागतो. मुळात या पाड्यात सरकारच्या कुठल्याच योजना राबवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’, ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

दुसरीकडे पाणीपुरवठा विभाग तालुक्यात पाणीटंचाई नसल्याचा कांगावा करत आहे. येथील आदिवासी, कष्टकरी समाजबांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. येथील अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते, याला काय म्हणायचे, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तर, भिवंडी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्यांनी पाणीटंचाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे पाणीटंचाईकडे कधी लक्ष देणार, अन्यथा आम्हालाच पंचायत समितीवर हंडे घेऊन धडक मारावी लागेल, असा इशारा अनिता वाघ या कार्यकर्तीने केला आहे. हा पाडा कोन जिल्हा परिषद गटात येत असून सदस्यांनी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

या पाड्यात तीव्र पाणीटंचाई आहे. ती दूर न केल्यास पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू. - गणपत हिलम, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, कातकरी घटक

या पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच यांनी याकडे लक्ष दिले आहे. - व्ही.डी. धोंडगे, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई