शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उल्हासनगरातील भूखंडावर वाचवा, मनसेचे प्रांत कार्यालयाला साकडे

By सदानंद नाईक | Updated: November 22, 2022 18:12 IST

महापालिका शाळेच्या मैदानावरील अतिक्रमणाचा प्रयत्न रविवारी जागृत नागरिकामुळे हाणून पाडल्याचा प्रकार उघड झाला.

उल्हासनगर : महापालिका शाळेच्या मैदानावरील अतिक्रमणाचा प्रयत्न रविवारी जागृत नागरिकामुळे हाणून पाडल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेऊन शहरातील भूखंड वाचविण्याचे साकडे निवेदनाद्वारे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत कार्यालयाकडे केले.

उल्हासनगरातील अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरातील जागेला सोन्याचे भाव आल्याने, खुले भूखंड, शासकीय कार्यालयाच्या जागा, शौचालय, समाजमंदिर, उद्यान आदी ठिकाणी अतिक्रमण होत असल्याच्या घटना घडत आहेत. आतातर महापालिका शाळा इमारत, शाळा मैदानावर अतिक्रमणाच्या घटना घडत आहेत. रविवारी महापालिका शाळा क्र-२२ च्या मैदानावर दगडमाती टाकून जेसीबी मशीनच्या साहाय्याने सपाटीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, प्रधान पाटील, समाजसेवक नरेंद्र तहेलरामानी यांच्यासह क्रीडाप्रेमी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मैदानावर धाव घेऊन यानिषेधार्थ हाताला काळ्या फिता लावून निषेध आंदोलन करून महापालिका आयुक्त यांना घटनेची माहिती दिली.

महापालिका शाळा क्र-२२ च्या मैदानावर अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांना मिळाल्यावर त्यांनी सोमवारी सकाळी मैदानाची पाहणी केली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संध्याकाळी मैदानात महापालिकेचे नामफलक लावले. मात्र ही कारवाई केल्यानंतर महापालिकेची जबाबदारी संपत नाही. यापूर्वीही महापालिका शाळा इमारत, उद्यान व खुल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा प्रकार घडले आहे. पोलीस वसाहतीचा भूखंड, शासकीय कार्यालयाच्या जागा, सामाजिक संस्थांच्या जागा, आरक्षित भूखंड आदी ठिकाणी प्रांत कार्यालयाकडून सनद (मालकी हक्क) दिल्याने, खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रांत कार्यालयावर संशयाची सुई जाते. प्रांत कार्यालयावर मोर्चे, उपोषण काढल्यानंतर काही सनद रद्द केल्याचा प्रकार घडला आहे. महापालिका कब्जात असलेल्या एकूण १ हजार ५५ मालमत्ता यामध्ये उद्यान, मैदान, शाळा, स्मशानभूमी जागा, शासकीय कार्यालय आदींच्या जागेला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र आतापर्यंत फक्त २६ जागांना सनद देण्यात आली. 

प्रांत कार्यालयाकडे साकडेमनसेने शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी शहरातील खुल्या जागा, भूखंड, शासकीय जागा आदीचे संरक्षण होण्यासाठी प्रांत कार्यालयाला निवेदनाद्वारे साकडे घातले. भूमाफियांकडून भूखंड असेच घशात गेल्याची टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर