शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

उल्हासनगरातील भूखंडावर वाचवा, मनसेचे प्रांत कार्यालयाला साकडे

By सदानंद नाईक | Updated: November 22, 2022 18:12 IST

महापालिका शाळेच्या मैदानावरील अतिक्रमणाचा प्रयत्न रविवारी जागृत नागरिकामुळे हाणून पाडल्याचा प्रकार उघड झाला.

उल्हासनगर : महापालिका शाळेच्या मैदानावरील अतिक्रमणाचा प्रयत्न रविवारी जागृत नागरिकामुळे हाणून पाडल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेऊन शहरातील भूखंड वाचविण्याचे साकडे निवेदनाद्वारे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत कार्यालयाकडे केले.

उल्हासनगरातील अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरातील जागेला सोन्याचे भाव आल्याने, खुले भूखंड, शासकीय कार्यालयाच्या जागा, शौचालय, समाजमंदिर, उद्यान आदी ठिकाणी अतिक्रमण होत असल्याच्या घटना घडत आहेत. आतातर महापालिका शाळा इमारत, शाळा मैदानावर अतिक्रमणाच्या घटना घडत आहेत. रविवारी महापालिका शाळा क्र-२२ च्या मैदानावर दगडमाती टाकून जेसीबी मशीनच्या साहाय्याने सपाटीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, प्रधान पाटील, समाजसेवक नरेंद्र तहेलरामानी यांच्यासह क्रीडाप्रेमी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी मैदानावर धाव घेऊन यानिषेधार्थ हाताला काळ्या फिता लावून निषेध आंदोलन करून महापालिका आयुक्त यांना घटनेची माहिती दिली.

महापालिका शाळा क्र-२२ च्या मैदानावर अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांना मिळाल्यावर त्यांनी सोमवारी सकाळी मैदानाची पाहणी केली. तर आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संध्याकाळी मैदानात महापालिकेचे नामफलक लावले. मात्र ही कारवाई केल्यानंतर महापालिकेची जबाबदारी संपत नाही. यापूर्वीही महापालिका शाळा इमारत, उद्यान व खुल्या जागेवर अतिक्रमण झाल्याचा प्रकार घडले आहे. पोलीस वसाहतीचा भूखंड, शासकीय कार्यालयाच्या जागा, सामाजिक संस्थांच्या जागा, आरक्षित भूखंड आदी ठिकाणी प्रांत कार्यालयाकडून सनद (मालकी हक्क) दिल्याने, खळबळ उडाली होती. त्यामुळे प्रांत कार्यालयावर संशयाची सुई जाते. प्रांत कार्यालयावर मोर्चे, उपोषण काढल्यानंतर काही सनद रद्द केल्याचा प्रकार घडला आहे. महापालिका कब्जात असलेल्या एकूण १ हजार ५५ मालमत्ता यामध्ये उद्यान, मैदान, शाळा, स्मशानभूमी जागा, शासकीय कार्यालय आदींच्या जागेला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र आतापर्यंत फक्त २६ जागांना सनद देण्यात आली. 

प्रांत कार्यालयाकडे साकडेमनसेने शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी शहरातील खुल्या जागा, भूखंड, शासकीय जागा आदीचे संरक्षण होण्यासाठी प्रांत कार्यालयाला निवेदनाद्वारे साकडे घातले. भूमाफियांकडून भूखंड असेच घशात गेल्याची टीका होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर