शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वा. सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार, कल्याणमध्ये ‘हे मृत्युंजय’चा विशेष प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 01:05 IST

लवकरच हे नाटक १५० प्रयोगांकडे वाटचाल करणार आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकर स्मारकातर्फे राज्यात विविध ठिकाणी ‘हे मृत्युंजय’ नाटकाचे प्रयोग केले जात आहेत. या नाटकाचा १३५ आणि १३६ वा प्रयोग सोमवारी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात झाला. त्याच्या दोन्ही प्रयोगांना तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. लवकरच हे नाटक १५० प्रयोगांकडे वाटचाल करणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे नाटक पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे सावरकर स्मारकाचे सदस्य सुनील वालावलकर यांनी सांगितले.वालावलकर पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत ‘हे मृत्युंजय’ नाटक ९० हजार विद्यार्थ्यांना नि:शुल्क दाखविले आहे. तसेच ३५० महाविद्यालयांत त्याचे प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे आठ प्रयोग हिंदीतूनही झाले आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही १४ मार्चला हे नाटक दाखविले गेले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांचा पुतळाही बसविण्यात आला.’ते पुढे म्हणाले, ‘केवळ नाटकच नाही, तर सावरकर स्मारकाच्या वतीने राज्यातील एक हजार वाचनालयांना सावरकर लिखित साहित्य मोफत देण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे युवा पिढीकडे मोठ्या आशेने पाहत होते. देश घडविण्यासाठी युवा पिढीच काहीतरी करू शकते, असा त्यांचा विश्वास होता. ‘हे मृत्युंजय’ नाटकात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिशांनी सुनावली होती. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ११ वर्षे सावरकरांनी शिक्षा भोगली होती. ही शिक्षा भोगत असताना त्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या, हेच या नाटकातून मांडले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काय यातना सहन कराव्या लागल्या, स्वातंत्र्यवीरांना काय मोल मोजावे लागले, स्वातंत्र्याची किंमत कळावी, यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे नाटक मोफत दाखविले जात आहे. सावरकरांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हा त्यामागचा हेतू आहे. शालेय पुस्तकातून जे शिकविले जात नाही, ते या नाटकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले आहे. हे नाटक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी पुढाकार घेतला आहे.’ दरम्यान, नाटकाच्या प्रयोगासाठी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी उपस्थिती लावली. सावरकरांचा विचार अंगीकारण्याची प्रेरणा या नाटकातून विद्यार्थांनी घेतली पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले....तर नाटकाचे फलितआजचा विद्यार्थी छोट्यामोठ्या कारणांमुळे अभ्यासाचा ताण घेतो. त्याचा राग आई-वडील व शिक्षकांवर काढतो. तसेच काही वेळेस वाममार्गालाही लागतो. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन देशासाठी वाहिले, त्यांचेही वय फारसे नव्हते. विद्यार्थीदशेपासून त्यांनी स्वातंत्र्याचा मंत्र अंगीकारला. तो प्रत्यक्षात आणला. ती प्रेरणा सावरकरांपासून घेऊन विद्यार्थ्यांनी देश घाडविण्याचे काम केल्यास ‘हे मृत्यंजय’ नाटकाचे फलित झाले, असे म्हणता येईल, असे वालावलकर यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे