शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

संजीव जयस्वाल जानेवारी २०२० पर्यंत ठाण्यातच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:35 IST

अतिरिक्त मुख्य सचिवांचे आदेश; बदलीच्या चर्चेला पूर्णविराम

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसाठी न्यायालयात काहींनी याचिका दाखल केली आहे. परंतु, दुसरीकडे शासनाने मात्र त्यांना १२ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे मंगळवारी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठीचे मनसुबे रचणाऱ्या विरोधकांना हा मोठा धक्का मानला जात आहे.ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची १२ जानेवारी २०१८ रोजी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. नव्या आदेशानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षांकरिता त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ती देतानाच राज्य सरकारला आवश्यक वाटल्यास त्यांची बदली ठरवण्यात आलेल्या दिवसापूर्वी करण्यात येणार असल्याचेही कुंटे यांनी या आदेशात नमूद केले आहे.मात्र, त्याचवेळी एका सनदी अधिकाºयाला एकाच महापालिकेत तब्बल पाच वर्षे काम करण्याची संधी देण्यात आल्याने ठाण्यातच नाही, तर राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. गुजरात राज्यात प्लेगची साथ आली होती, त्यावेळी तत्कालीन राव नावाचे सनदी अधिकारी होते. त्यांना पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारकडून अशी संधी सनदी अधिकाºयांना दिली जाते. ठाणे शहरात सध्या क्लस्टर, मेट्रो आदी महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी जयस्वाल यांना वाढीव कालावधी दिल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात शहरातील डीपी रस्ते पूर्ण करण्यास महापालिकेने प्राधान्य दिले आहे. ८० टक्कयांपेक्षा जास्त रस्त्यांचे यामध्ये रुंदीकरण केले आहे. ठाण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांना तीन वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची बदली व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल येण्याआधीच हा निर्णय आला आहे.बदलीबाबत उलटसुलट चर्चाआता राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात आयुक्तांना जास्त कालावधी दिला असल्याने बदलीचा विषय थांबतो की, ऐन लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तो पेटतो, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मात्र, शासनाच्या मंगळवारच्या आदेशामुळे आयुक्तांच्या बदलीस तूर्त तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आणखी वर्षभर जयस्वाल ठाण्यातच कार्यरत असतील.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त