शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची तीन तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:57 IST

खंडणी वसुली प्रकरण; पांडे यांनी केला आराेपांचा इन्कार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खोटे गुन्हे दाखल करणे, कटकारस्थान करणे आणि खंडणी उकळणे असे आरोप असलेले राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून बुधवारी तीन तास चौकशी करण्यात आली. याच गुन्ह्यात पांडे यांच्यासह अन्य सहा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षणासाठी अंतरिम जामीन दिला आहे.

पोलिसांच्या चौकशीला पांडे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, आपल्यावरील आरोपांचा इन्कार करीत, हे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी चौकशीमध्ये पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दोन बड्या नेत्यांच्या नावासाठी दबाव nखंडणी प्रकरणातील कथित आरोपी पांडे हे गुन्हे शाखेत आल्याची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार पुनामिया हेही या कार्यालयाच्या बाहेर दुपारी २ वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. nमीरा भाईंदरच्या करोडो रुपयांच्या जमीन घाेटाळ्यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये दोन बड्या नेत्यांची नावे घ्यावीत, असा दबाव पांडे यांनी आपल्यावर आणल्याचा आरोप पुनामिया यांनी प्रसारमाध्यमांकडे केला.

अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेशपांडे यांच्याविरुद्ध ठाण्यातील २६ ऑगस्ट २०२४ रोजी भाईंदरचे बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया यांनी गुन्हा दाखल केला. तत्कालीन विशेष सरकारी वकील शेखर जगताप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक मनोहर पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या अन्य सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

याच प्रकरणामध्ये ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटमध्ये चौकशीसाठी पांडे यांना पाचारण केले होते. सामान्य व्यक्तीप्रमाणे एका रिक्षाने दाखल झालेल्या पांडे यांची गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांनी चौकशी केली.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस