शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
4
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
5
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
6
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
7
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
8
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
9
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
10
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
11
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
12
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
13
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
14
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
15
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
16
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
17
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
18
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

भिवंडी महानगरपालिकेवर समाजवादी पार्टीचे जल आक्रोश आंदोलन; शेकडो नागरिक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 18:53 IST

शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - महानगरपालिका लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ बुधवारी संपत असतांनाच समाजवादी पार्टी भिवंडी शहराध्यक्ष रियाज आजमी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढून पाणी समस्ये बाबत जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले.

शहरातील फातमा नगर नूरी नगर, शांतीनगर, खंडू पाडा या भागात पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक विभागात मध्यरात्री नंतर पाणी पुरवठा केला जात असून त्या विरोधात नागरिकांमधून सतत ओरड होत आहे. शहरात नागरीकांसाठी समान पाणीपुरवठा धोरण राबवावे ,स्वच्छ पिण्याचे पाणी द्यावे ,काही ठिकाणी अस्वच्छ पाणी दिले जाते .स्टेम कडून मिळणारे ७५ एमएलडी पाणी हे शहरातील वेगळ्या नागरी वस्तीत दिले जाते ,तर अशुद्ध पाणी झोपडपट्टी विभागात दिले जाते ही गोरगरीब जनतेची फसवणूक होत आहे.तर शहरात शंभर कोटी रुपये खर्च करून केलेल्या पाणीपुरवठा योजनेतील १९ पैकी आज ही १४ पाण्याच्या टाक्या सुरू करण्यात प्रशासनास अपयश आले असून या बाबत तात्काळ निर्णय घेऊन प्रशासनाने पाणी पुरवठा सुनियोजित पद्धतीने होण्याची मागणी शहराध्यक्ष रियाज आजमी यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

यावेळी शहराध्यक्ष रियाज आजमीसह समाजवादीचे पदाधिकारी रियाज ताहीर,जावेद अन्सारी ,हमीद शेख ,फारुख अन्सारी ,आलमगीर खान ,जुबेर शेख ,सुग्गी देवी यादव यांचे शिष्टमंडळ आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यालयात गेले असता त्यांना सुरवातीला आयुक्तांनी व्यस्तते मुळे भेट नाकारली असता शिष्टमंडळाने आयुकांच्या दालनाबाहेर बैठक मारून घोषणाबाजी सुरू केली .अर्ध्या  तासाने अवघ्या काही मिनिटांसाठी वेळ दिल्यानंतर निवेदन स्वीकारून आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांचे समाधान केले .या प्रसंगी पोलिसांनी प्रवेशद्वारासह मुख्यालयात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .