शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे

By नितीन पंडित | Updated: August 3, 2023 17:29 IST

शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

भिवंडी: भिवंडीत बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा शासनाच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून  होत असताना अंबाडी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केलेली खते ही बोगस असल्याची व त्यासोबतच खतांच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देत दिलेल्या निवेदनात केले आहे.

अंबाडी ,दाभाड,दिघाशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज ही भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.तेथील असंख्य शेतकऱ्यांनी दाभाड येथील पल्लवी कृषी सेवा केंद्रातून १८:१८:१० हे खत खरेदी केले होते.परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसात शेतात टाकलेले खत हे पाण्यावर तरंगताना दिसले.त्यामुळे शेतकरी शिवाजी राऊत यांनी शंका घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर कृषी अधिकारी राहुल शिरसाड,पंचायत समिती कृषी अधिकारी निता गवळी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता खत विक्री दुकानातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर काचवे यांनी सुध्दा खत पाण्यावर तरंगत असल्याचे जबाबात मान्य केले आहे.

भात लागवड जोमाने व्हावी यासाठी शेतकरी पदरमोड करून खत खरेदी करीत आहे पण ते बोगस निघाल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्ना  वर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास कोण जबाबदार राहणार असा सवाल शेतकरी शिवाजी राऊत यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.तर या भागात युरिया खत हे शासनाने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री केले जात असल्याची तक्रार देखील शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी