शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भिवंडीत बोगस खतांची विक्री; खत पाण्यात न विरघळता बनले प्लास्टिकचे बोळे

By नितीन पंडित | Updated: August 3, 2023 17:29 IST

शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

भिवंडी: भिवंडीत बोगस खत विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याने शेतात टाकलेले खत पाण्यात न विरघळत चक्क प्लास्टिकचे गोळे बनल्याने हा आश्चर्यकारक प्रकार पाहून येथील शेतकरी हैराण झाले आहेत. याप्रकरणी त्रस्त शेतकऱ्याने गुरुवारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे निवेदन सादर करून बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा पुरवठा शासनाच्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून  होत असताना अंबाडी परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केलेली खते ही बोगस असल्याची व त्यासोबतच खतांच्या किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांना देत दिलेल्या निवेदनात केले आहे.

अंबाडी ,दाभाड,दिघाशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आज ही भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.तेथील असंख्य शेतकऱ्यांनी दाभाड येथील पल्लवी कृषी सेवा केंद्रातून १८:१८:१० हे खत खरेदी केले होते.परंतु मागील काही दिवसात झालेल्या पावसात शेतात टाकलेले खत हे पाण्यावर तरंगताना दिसले.त्यामुळे शेतकरी शिवाजी राऊत यांनी शंका घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यानंतर कृषी अधिकारी राहुल शिरसाड,पंचायत समिती कृषी अधिकारी निता गवळी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता खत विक्री दुकानातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर काचवे यांनी सुध्दा खत पाण्यावर तरंगत असल्याचे जबाबात मान्य केले आहे.

भात लागवड जोमाने व्हावी यासाठी शेतकरी पदरमोड करून खत खरेदी करीत आहे पण ते बोगस निघाल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्ना  वर होणार असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानास कोण जबाबदार राहणार असा सवाल शेतकरी शिवाजी राऊत यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.तर या भागात युरिया खत हे शासनाने जाहीर केलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीला विक्री केले जात असल्याची तक्रार देखील शिवाजी राऊत यांनी तहसीलदार अधिक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी