शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साईशक्ती दुर्घटना; सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:42 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उल्हासनगर : कॅम्प नं. २, नेहरू चौक येथील साईशक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री ९.३० वाजता तळमजल्यापर्यंत कोसळून ७ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी झाला. इमारतीचा मध्यरात्रीपर्यंत ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. दरम्यान, इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसांत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत.कॅम्प नं. २ मधील साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडून ढिगाऱ्याखाली ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून ५ जणांचे मृतदेह काढल्यानंतर त्यांच्या मदतीला टीडीआरएफची टीम आली. त्यांच्या मदतीने आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. असे एकूण ७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, असे सांगण्यात आले, तर एक जण जखमी झाला. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री शिंदे, आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नाव अलगोत नायडर (६०) आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पुनीत चांदवानी (१७), दिनेश चांदवानी (३५), दीपक चांदवानी (४२), मोहिनी चांदवानी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), नम्रता मूलचंद बजाज (२१) व लवली बजाज (४६) यांचा समावेश आहे. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. फ्लॅट ३०४ व ४०४ हे रिकामे होते, तर २०२ फ्लॅटमधील रहिवासी बेडरूममध्ये होते, अशी माहिती शिंपी यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. उल्हासनगरात १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने बहुतांश बांधकामे दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाली आहेत. याचदरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.  इमारतीमधील १५ कुटुंबे थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारत पालिकेने रात्री सील केली. एकूण २९ फ्लॅटपैकी अर्धेअधिक फ्लॅट हे रिकामे असून, इतर कुटुंबांची थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. दागिने, संसारोपयोगी वस्तू काढण्यासाठी बेघर झालेल्या कुटुंबांना शनिवारी परवानगी देण्यात आली.