शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

साईशक्ती दुर्घटना; सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:42 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उल्हासनगर : कॅम्प नं. २, नेहरू चौक येथील साईशक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री ९.३० वाजता तळमजल्यापर्यंत कोसळून ७ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी झाला. इमारतीचा मध्यरात्रीपर्यंत ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. दरम्यान, इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसांत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत.कॅम्प नं. २ मधील साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडून ढिगाऱ्याखाली ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून ५ जणांचे मृतदेह काढल्यानंतर त्यांच्या मदतीला टीडीआरएफची टीम आली. त्यांच्या मदतीने आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. असे एकूण ७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, असे सांगण्यात आले, तर एक जण जखमी झाला. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री शिंदे, आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नाव अलगोत नायडर (६०) आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पुनीत चांदवानी (१७), दिनेश चांदवानी (३५), दीपक चांदवानी (४२), मोहिनी चांदवानी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), नम्रता मूलचंद बजाज (२१) व लवली बजाज (४६) यांचा समावेश आहे. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. फ्लॅट ३०४ व ४०४ हे रिकामे होते, तर २०२ फ्लॅटमधील रहिवासी बेडरूममध्ये होते, अशी माहिती शिंपी यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. उल्हासनगरात १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने बहुतांश बांधकामे दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाली आहेत. याचदरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.  इमारतीमधील १५ कुटुंबे थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारत पालिकेने रात्री सील केली. एकूण २९ फ्लॅटपैकी अर्धेअधिक फ्लॅट हे रिकामे असून, इतर कुटुंबांची थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. दागिने, संसारोपयोगी वस्तू काढण्यासाठी बेघर झालेल्या कुटुंबांना शनिवारी परवानगी देण्यात आली.