शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

साईशक्ती दुर्घटना; सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:42 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उल्हासनगर : कॅम्प नं. २, नेहरू चौक येथील साईशक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री ९.३० वाजता तळमजल्यापर्यंत कोसळून ७ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी झाला. इमारतीचा मध्यरात्रीपर्यंत ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली. दरम्यान, इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसांत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत.कॅम्प नं. २ मधील साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडून ढिगाऱ्याखाली ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून ५ जणांचे मृतदेह काढल्यानंतर त्यांच्या मदतीला टीडीआरएफची टीम आली. त्यांच्या मदतीने आणखी दोन मृतदेह बाहेर काढले. असे एकूण ७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, असे सांगण्यात आले, तर एक जण जखमी झाला. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री शिंदे, आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचे नाव अलगोत नायडर (६०) आहे, तर मृत्यू झालेल्यांमध्ये पुनीत चांदवानी (१७), दिनेश चांदवानी (३५), दीपक चांदवानी (४२), मोहिनी चांदवानी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), नम्रता मूलचंद बजाज (२१) व लवली बजाज (४६) यांचा समावेश आहे. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. फ्लॅट ३०४ व ४०४ हे रिकामे होते, तर २०२ फ्लॅटमधील रहिवासी बेडरूममध्ये होते, अशी माहिती शिंपी यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी या वेळी दिले. उल्हासनगरात १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने बहुतांश बांधकामे दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाली आहेत. याचदरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतींचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत.  इमारतीमधील १५ कुटुंबे थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारत पालिकेने रात्री सील केली. एकूण २९ फ्लॅटपैकी अर्धेअधिक फ्लॅट हे रिकामे असून, इतर कुटुंबांची थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. दागिने, संसारोपयोगी वस्तू काढण्यासाठी बेघर झालेल्या कुटुंबांना शनिवारी परवानगी देण्यात आली.