शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

माझा शेतकरी राज्याचा कणा--- - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 19:29 IST

अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची शासनाची भूमिका आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसानसर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे

ठाणे : माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो कणा मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व या ठिकाणी काम करीत आाहोत आणि या सर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार आहोत, असे सुतोवाच कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यां प्रसंगी रविवारी केले.     अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची शासनाची भूमिका आहे. या दृष्टÑीकोनातून मुख्यमंत्र्यांसह उद्धवजी आणि सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे आहेत. शेतकऱ्यांना निश्चितपणाने मदत देण्याच्या भूमिकेतून त्यांना धीर देत आहेत. कारण शेवटी माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व काम करीत आहोत आणि त्यातून निश्चितपणाने शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार असल्याचे खोत यांनी या दौऱ्यां प्रसंगी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.        भिवंडी तालुक्यातील महापोली,पालखणे, सुर्यानगर, विश्वगड, झिडके येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी खोत यांनी केली. कृषी अधिकारी, तलाठी, कृषीसेवक, तालुका प्रशासनास आदीं यंत्रणांनी लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. भिवंडी कृषी उत्पन्न बाज़ार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत बैठक घेउन संवाद साधला आणी शेतकऱ्यांना धीर देत मदतीच्या आश्वासनांचा दिलासा दिला.       परतीच्या पावसाने शेतकºयांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्धवस्त झाले आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी यावेळी जारी केले.      यावेळी आमदार शांताराम मोरे, ठाणे ज़िल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती दीपाली पाटील, शिवसेनेचे ग्रामीण ज़िल्हा प्रमुख प्रकाश पाटील, विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील, ज़िल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, पंचायत समिति सभापती ज्योती ठाकरे, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.............फोटो - ०३ठाणे सदाभाऊ खोत

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद