शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

वसईतील सर्वच मार्गावर बसेस चालवू

By admin | Updated: June 23, 2017 05:08 IST

सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने

शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने एक तर सर्वच मार्गावर बस सेवा सुरु करा अन्यथा सगळेच मार्ग आम्हाला द्या, असेच वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाला अप्रत्यक्षरित्या सुनावले. त्यामुळे फक्त फायद्याचेच रुट मागणाऱ्या परिवहन विभागाची कोंडी झाली आहे.एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरी मार्गावरील बससेवा बंद करून महापालिकेच्या परिवहन सेवेला दिल्या आहेत. मात्र, परिवहन विभागाने फायद्याचे मार्गावरच बससेवा सुरु करून वसई आणि नालासोपारा डेपोतून ग्रामीण भागात सुटणाऱ्या रुटवर बस सेवा सुरु करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी आणि प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने वसई आणि नालासोपारा डेपोतून उर्वरित २१ रुटवर बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जवळपास दहा महिन्यांपासून बस सेवा सुरु करण्याचे टाळले आहे. एसटी महामंडळाने तीनवेळा या रुटवरील बससेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनही झाले होते. शेवटी डॉमणिका डाबरे आणि एक विद्यार्थी शयरन डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णय होईपर्यंत बससेवा सुरु ठेवण्याचेआदेश एसटीला दिले आहेत. दरम्यान, परिवहन विभाग जागेसाठी अडून बसले आहे. तर एसटी महामंडळ जागा न देण्यावर ठाम आहे. त्यामुळे हा वाद मिटत नसल्याने परिवहन विभाग बससेवा सुरु करीत नाही. आता २२ जून २०१७ रोजी हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात सध्या फायद्यात असलेले वसई-ठाणे-मुलुंड, वसई-नवघर, नवघर पूर्व-सातीवली, नवघर पूर्व-वसई-हायवे फाटा, अर्नाळा-विरार, अर्नाळा-विरार-हायवे आणि नालासोपारा-हायवे फाटा या रुटवर बस चालवण्यास तयार असल्याचेही नमूद केले आहे. या रूटवर सध्या परिवहनच्या बसेस धावत आहेत.