शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

वसईतील सर्वच मार्गावर बसेस चालवू

By admin | Updated: June 23, 2017 05:08 IST

सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने

शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने एक तर सर्वच मार्गावर बस सेवा सुरु करा अन्यथा सगळेच मार्ग आम्हाला द्या, असेच वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाला अप्रत्यक्षरित्या सुनावले. त्यामुळे फक्त फायद्याचेच रुट मागणाऱ्या परिवहन विभागाची कोंडी झाली आहे.एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरी मार्गावरील बससेवा बंद करून महापालिकेच्या परिवहन सेवेला दिल्या आहेत. मात्र, परिवहन विभागाने फायद्याचे मार्गावरच बससेवा सुरु करून वसई आणि नालासोपारा डेपोतून ग्रामीण भागात सुटणाऱ्या रुटवर बस सेवा सुरु करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी आणि प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने वसई आणि नालासोपारा डेपोतून उर्वरित २१ रुटवर बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जवळपास दहा महिन्यांपासून बस सेवा सुरु करण्याचे टाळले आहे. एसटी महामंडळाने तीनवेळा या रुटवरील बससेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनही झाले होते. शेवटी डॉमणिका डाबरे आणि एक विद्यार्थी शयरन डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णय होईपर्यंत बससेवा सुरु ठेवण्याचेआदेश एसटीला दिले आहेत. दरम्यान, परिवहन विभाग जागेसाठी अडून बसले आहे. तर एसटी महामंडळ जागा न देण्यावर ठाम आहे. त्यामुळे हा वाद मिटत नसल्याने परिवहन विभाग बससेवा सुरु करीत नाही. आता २२ जून २०१७ रोजी हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात सध्या फायद्यात असलेले वसई-ठाणे-मुलुंड, वसई-नवघर, नवघर पूर्व-सातीवली, नवघर पूर्व-वसई-हायवे फाटा, अर्नाळा-विरार, अर्नाळा-विरार-हायवे आणि नालासोपारा-हायवे फाटा या रुटवर बस चालवण्यास तयार असल्याचेही नमूद केले आहे. या रूटवर सध्या परिवहनच्या बसेस धावत आहेत.