शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारवीचे दरवाजे उघडल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:32 IST

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. ...

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात पुराचा धोका असल्याची बातमी सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, सायंकाळी सोशल मीडियावरूनच अनेकांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाल्याने या धरणात नव्या क्षमतेनुसार ७० टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. अजूनही ३० टक्के धरण भरणे बाकी असतानाच बारवी धरण भरल्याची अफवा बदलापुरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर धरण भरल्याचे आणि बारवीचे दरवाजे उघडल्याची चर्चा होती. त्यामुळे पुरामुळे आधीच भेदरलेले कुटुंबीय चिंतेत आले. प्रत्येकाने त्याचा धसका घेतला होता. या अफेवेबाबत राजकीय पुढाऱ्यांनी प्रभाग आणि शहरात बारवीबाबतची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धरणाची सद्य:स्थितीतील पाण्याची पातळी व बंद असलेले दरवाजे यांचे फोटो टाकून नागरिकांना दिलासा दिला. ते पाहिल्यावर अनेकांच्या मनातील भीती कमी झाली.अशी परिस्थिती उद्भवल्यास काय? : बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यास बदलापूर शहराला धोका निर्माण होण्याचा काहीच संबंध नाही. बारवीचे दरवाजे उघडले तरी त्याचा फटका हा नदी काठी असलेल्या गावाना बसेल. त्याचा कोणताच धोका बदलापूरला नाही. धरणाचे दरवाचे उघडले तर त्या पाण्याचा प्रवाह नालंबी, आणे, भिसोळ, कांबा या भागाला बाधित करणारा ठरू शकतो. मात्र, या धरणाची उंची वाढल्याने धरण भरण्यासाठी अजून बराच विलंब लागणार आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे