शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बारवीचे दरवाजे उघडल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:32 IST

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. ...

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात पुराचा धोका असल्याची बातमी सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, सायंकाळी सोशल मीडियावरूनच अनेकांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाल्याने या धरणात नव्या क्षमतेनुसार ७० टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. अजूनही ३० टक्के धरण भरणे बाकी असतानाच बारवी धरण भरल्याची अफवा बदलापुरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर धरण भरल्याचे आणि बारवीचे दरवाजे उघडल्याची चर्चा होती. त्यामुळे पुरामुळे आधीच भेदरलेले कुटुंबीय चिंतेत आले. प्रत्येकाने त्याचा धसका घेतला होता. या अफेवेबाबत राजकीय पुढाऱ्यांनी प्रभाग आणि शहरात बारवीबाबतची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धरणाची सद्य:स्थितीतील पाण्याची पातळी व बंद असलेले दरवाजे यांचे फोटो टाकून नागरिकांना दिलासा दिला. ते पाहिल्यावर अनेकांच्या मनातील भीती कमी झाली.अशी परिस्थिती उद्भवल्यास काय? : बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यास बदलापूर शहराला धोका निर्माण होण्याचा काहीच संबंध नाही. बारवीचे दरवाजे उघडले तरी त्याचा फटका हा नदी काठी असलेल्या गावाना बसेल. त्याचा कोणताच धोका बदलापूरला नाही. धरणाचे दरवाचे उघडले तर त्या पाण्याचा प्रवाह नालंबी, आणे, भिसोळ, कांबा या भागाला बाधित करणारा ठरू शकतो. मात्र, या धरणाची उंची वाढल्याने धरण भरण्यासाठी अजून बराच विलंब लागणार आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे