शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बारवीचे दरवाजे उघडल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:32 IST

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. ...

बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात पुराचा धोका असल्याची बातमी सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, सायंकाळी सोशल मीडियावरूनच अनेकांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाल्याने या धरणात नव्या क्षमतेनुसार ७० टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. अजूनही ३० टक्के धरण भरणे बाकी असतानाच बारवी धरण भरल्याची अफवा बदलापुरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर धरण भरल्याचे आणि बारवीचे दरवाजे उघडल्याची चर्चा होती. त्यामुळे पुरामुळे आधीच भेदरलेले कुटुंबीय चिंतेत आले. प्रत्येकाने त्याचा धसका घेतला होता. या अफेवेबाबत राजकीय पुढाऱ्यांनी प्रभाग आणि शहरात बारवीबाबतची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धरणाची सद्य:स्थितीतील पाण्याची पातळी व बंद असलेले दरवाजे यांचे फोटो टाकून नागरिकांना दिलासा दिला. ते पाहिल्यावर अनेकांच्या मनातील भीती कमी झाली.अशी परिस्थिती उद्भवल्यास काय? : बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यास बदलापूर शहराला धोका निर्माण होण्याचा काहीच संबंध नाही. बारवीचे दरवाजे उघडले तरी त्याचा फटका हा नदी काठी असलेल्या गावाना बसेल. त्याचा कोणताच धोका बदलापूरला नाही. धरणाचे दरवाचे उघडले तर त्या पाण्याचा प्रवाह नालंबी, आणे, भिसोळ, कांबा या भागाला बाधित करणारा ठरू शकतो. मात्र, या धरणाची उंची वाढल्याने धरण भरण्यासाठी अजून बराच विलंब लागणार आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे