शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

उल्हासनगरमध्ये सत्तारूढ भाजपा फुटली; शिवसेनेचा कमळाला 'धोबीपछाड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:09 IST

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने आणि तो सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. शिवसेना- भाजपमध्ये घोषणाबाजी, बाचाबाची, नगरसेवक पळवापळवीचे आरोप, आपापल्या नगरसेवकांना खेचून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने महापौरपदाची निवडणूक खोळंबली आहे. एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य फुटल्याने या पालिकेतील भाजपची सत्ता जवळपास गेल्यात जमा आहे. ज्या ओमी कलानी यांच्या मदतीमुळे उल्हासनगर महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यांना सत्तेचा वाटा देण्यापासून भाजपच्या एका सतत रोखले, कोंडी केली आणि आमदाकरीच्या निवडणुकीवेळी ज्योती कलानी यांना राष्ट्रवादी सोडायला लावून नंतर भाजपतर्फेही उमेदवारी दिली नाही. त्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणातून कलानी कुटुंब संपवल्याची भाषा केली. त्याचा परिणाम आजच्या घडामोडींवर दिसून आला. भाजपाने या संधीचा फायदा उठवला. उल्हासनगर पालिकेत महापौरपदासाठी ४० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या शिवसेनेकडे त्यांचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँग्रेस, भारिप, पीआरपीचे प्रत्येकी एक असे ३५ सदस्य आहेत. त्यात भाजपाचा फुटीर गट समाविष्ट झाल्याने ही संख्या ४६ पेक्षा अधिक झाली आहे. भाजपकडे स्वतःचे ३१, घाईघाईने विलीन करून घेतलेले साई पक्षाचे १० आणि विलीन न होता वेगळे राहिलेले साई पक्षाचेच दोन असे ४३ चे संख्याबळ होते. पण त्यातील किमान ११ पेक्षा अधिक नगरसेवक फुटल्याने त्यांची संख्या घटून ३२ पर्यंत खाली आली आहे. परिणामी शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर