शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लाचखोरांना मलाईदार पदे देत नियमाला तिलांजली; अधिकारी, कर्मचारी पुन्हा केडीएमसीच्या सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 01:16 IST

सरळसेवा भरतीवर सरकारकडून निर्बंध लागू आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून काम करून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लाचेची हाव कमी होत नसल्याची प्रचिती विविध घटनांमधून वारंवार येत आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार पाच वर्षांत लाचखोरी व अन्य फौजदारी प्रकरणांमधील २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन संपुष्टात आणले आहे. यातील लाचखोरांना सेवेत घेताना त्यांना अकार्यकारीपद देणे बंधनकारक आहे. पण, या नियमाला तिलांजली दिल्याने निलंबन संपुष्टात आलेले संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. याबाबत अधिकारी आणि कर्मचाºयांची वानवा असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाकडे २०१४ ते २०१९ या कालावधीत पुनर्स्थापित केलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांची माहिती पत्राद्वारे मागितली होती. त्याप्रमाणे लाचखोरीसह अन्य फौजदारी प्रकरणांमध्ये निलंबित असलेल्यांना निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार पुन्हा सेवेत घेतल्याची माहिती राणे यांना देण्यात आली आहे. ती माहिती महासभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे.एकीकडे लाचखोरीच्या प्रकरणांमुळे केडीएमसीतील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असताना वारंवार या घटना महापालिकेत घडत आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना सरकारी निर्णय लाचखोरांच्या हिताचे ठरत आहेत. २०११च्या निर्देशानुसार निलंबित झाल्यापासून दोन वर्षांत पुन्हा संबंधित लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी सेवेत दाखल होऊ शकतो. अशा प्रकरणांत पकडले गेल्यानंतर पहिले सहा महिने त्याला अर्धे वेतन, तर नंतर ७५ टक्के वेतन देणे बंधनकारक आहे. लाचलुचपत प्रकरण असो अथवा अन्य प्रकरणात फौजदारी कारवाई व निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेत निलंबन आढावा समिती असते. त्याप्रमाणे केडीएमसीतही निलंबन आढावा समितीच्या बैठकांमध्ये निलंबितांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. पाच वर्षांत २३ निलंबित अधिकारी, कर्मचाºयांना सेवेत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लाचखोरीतील अधिकारी आणि कर्मचाºयांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना सेवेत घेताना सरकारच्या निलंबित सरकारी सेवकांच्या २०११ च्या निर्देशानुसार जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारीपदापासून त्यांना दूर ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत महापालिकेत सुरुवातीपासूनच लाचखोरांना कार्यकारीपदे बहाल केली गेली आहेत.कार्यकारीपद म्हणून देणे भाग पडते!सरळसेवा भरतीवर सरकारकडून निर्बंध लागू आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून काम करून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. त्यात कार्यकारी अभियंता पदे आणि अन्य अधिकाºयांची पदेही सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे या प्राप्त परिस्थितीत निलंबन संपुष्टात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून काम करून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे तसेच प्रशासकीय सोयीसाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल झालेले आहेत, असे स्पष्टीकरण प्रशासनाने राणे यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात दिले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका