शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ठाणे, पालघरमध्ये एकाच दिवसात ५३७ बसेसवर आरटीओची कारवाई: ३० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 20:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यभर चालणाºया अवैध प्रवासी वाहतूकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि ...

ठळक मुद्दे परिवहन विभागाचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह २५ अधिकारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यभर चालणाºया अवैध प्रवासी वाहतूकीविरुद्ध राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार ठाणे आणि पालघर जिल्हयात प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्यासह २५ अधिकाऱ्यांच्या चमूने ५३७ वाहनांवर कारवाई केली. तर ३० बसेस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान एकाच वेळी ही मोहीम राबविण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन अधिकाºयांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयातील पडघा, घोडबंदर रोड, कळवा - खारेगाव नाका आणि पालघर चेक पोस्ट तसेच नवी मुंबई आणि कल्याण या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी स्वत: ठाणे विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांच्यासह मुख्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, अंमलबजावणी विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील सर्व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक आणि सहायक मोटर वाहन निरीक्षक अशा अधिकाºयांच्या चमूने ही कारवाई ठिकठिकाणी केली. यामध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरित्या माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीरपणे फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक आणि मोटार वाहन कर बुडविणे आदी बाबींची पडताळणी करण्यात आली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तीन हात नाका येथे मोठया प्रमाणात अशा प्रकारे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाºया बसेस पकडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी आरटीओने अशाच प्रकारे ओव्हरलोड वाहतूक तसेच अवैध प्रवासी वाहतूकीवर कारवाई केली होती. कारवाया थंडावल्यानंतर पुन्हा अवैध वाहतूक सुरु झाली. त्यामुळे राज्यभर अशा प्रकारे पुन्हा कारवाईचे आदेश परिवहन कार्यालयाने दिले होते. या कारवाईमध्ये अवघ्या १२ तासांमध्ये पडघा येथे ७५ बसेसवर कारवाई झाली. दोन बसेस जप्त करण्यात आल्या. त्यापाठोपाठ तीन हात नाका येथे ८० बसेसवर कारवाई करुन दोन बसेसवर जप्तीची कारवाई झाली. घोडबंदर रोड येथे ३७ कारवाया झाल्या. त्यातील चार वाहने जप्त झाली. कळवा येथे ५९ वाहनांवर कारवाई झाली. तर पालघर येथील गुजरात सीमेवरील चेक पोस्ट येथे सर्वाधिक १३० बसेसवर कारवाई झाली. नवी मुंबईत ५५ बसेसवर कारवाई झाली असून १५ बसेस जप्त करण्यात आल्या. तर कल्याणमध्ये ६० बसेसवर कारवाई झाली. यामध्ये एक बस जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘‘ गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूककीबाबतच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार ठाणे आणि पालघरमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ५३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर ३० वाहने जप्त करण्यात आली.’’रवींद्र गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाण्णे

टॅग्स :thaneठाणेRto officeआरटीओ ऑफीस