शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा?

By admin | Updated: January 29, 2017 03:16 IST

ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा

ठाणे : ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेपाठोपाठ रिपाइंची बोलणी फिस्कटली, तर सत्ताधारी भाजपाला मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, असा संदेश जातो. त्यामुळे रिपाइंने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. रिपाइंच्या मागणीवर भाजपाचा निर्णय काय होणार, ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, रिपाइंला ५ तर शिवसंग्रामला १ जागेखेरीज जास्त जागा सोडण्यास भाजपा तयार नाही, असे संकेत प्राप्त झाले आहेत. शिवसेनेबरोबरची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली, तेव्हाच भाजपाने रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या युतीच्या मित्रपक्षांना आपल्याकडे खेचले. रिपाइंचे रामदास आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. रिपाइंसोबत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिपाइंला किती आणि कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात, याचा अंदाज भाजपा घेत आहे. मात्र, तेवढ्यात रिपाइंने अचानक आपला दावा २० जागांवरून ३० जागांवर वाढवला आहे. भाजपाची लढत शिवसेनेबरोबर असून भाजपाकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. रिपाइंला जास्तीतजास्त ४ ते ५ जागा देण्याची भाजपाची तयारी आहे. ‘शिवसंग्राम’ संघटनेने भाजपाकडे १६ जागा मागितल्या आहेत. या पक्षाला केवळ एक किंवा दोन जागा भाजपा देऊ शकते. येत्या मंगळवार, ३१ जानेवारीस माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून उमेदवारांचे अर्ज दाखल करणे सुरू होईल. तत्पूर्वी म्हणजे रविवार-सोमवारी भाजपाचे स्थानिक नेते व रिपाइं, शिवसंग्रामचे नेते यांच्यात जागावाटपाचा फैसला होणे अपेक्षित आहे. समजा, हे पक्ष आपापल्या दाव्यांवर ठाम राहिले, तर त्यांच्याशी वाटाघाटी न करता अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही प्रबळ बंडखोरांची बंडखोरी काबूत आणता येईल. किरकोळ बंडखोरीची दखल न घेण्याचे धोरण भाजपा स्वीकारेल, असे समजते. (प्रतिनिधी)भाजपाकडून चर्चेला सुरुवात झाली असून त्यांच्याकडे आम्ही आता २० नाही तर ३० जागा मागितल्या आहेत. चर्चेअंती किती जागा मिळतील, त्यावरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे.-रामभाऊ तायडे, रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष, आठवले गट