शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंला ५, शिवसंग्राम १ जागा?

By admin | Updated: January 29, 2017 03:16 IST

ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा

ठाणे : ठाण्यात शिवसेना-भाजपाचा काडीमोड होताच आतापर्यंत २० जागांची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (रिपाइं) आणखी १० जागांची मागणी करीत ३० जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेपाठोपाठ रिपाइंची बोलणी फिस्कटली, तर सत्ताधारी भाजपाला मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, असा संदेश जातो. त्यामुळे रिपाइंने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. रिपाइंच्या मागणीवर भाजपाचा निर्णय काय होणार, ते येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, रिपाइंला ५ तर शिवसंग्रामला १ जागेखेरीज जास्त जागा सोडण्यास भाजपा तयार नाही, असे संकेत प्राप्त झाले आहेत. शिवसेनेबरोबरची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली, तेव्हाच भाजपाने रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या युतीच्या मित्रपक्षांना आपल्याकडे खेचले. रिपाइंचे रामदास आठवले सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. रिपाइंसोबत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिपाइंला किती आणि कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात, याचा अंदाज भाजपा घेत आहे. मात्र, तेवढ्यात रिपाइंने अचानक आपला दावा २० जागांवरून ३० जागांवर वाढवला आहे. भाजपाची लढत शिवसेनेबरोबर असून भाजपाकरिता प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. रिपाइंला जास्तीतजास्त ४ ते ५ जागा देण्याची भाजपाची तयारी आहे. ‘शिवसंग्राम’ संघटनेने भाजपाकडे १६ जागा मागितल्या आहेत. या पक्षाला केवळ एक किंवा दोन जागा भाजपा देऊ शकते. येत्या मंगळवार, ३१ जानेवारीस माघी गणेशोत्सवास प्रारंभ होत असून उमेदवारांचे अर्ज दाखल करणे सुरू होईल. तत्पूर्वी म्हणजे रविवार-सोमवारी भाजपाचे स्थानिक नेते व रिपाइं, शिवसंग्रामचे नेते यांच्यात जागावाटपाचा फैसला होणे अपेक्षित आहे. समजा, हे पक्ष आपापल्या दाव्यांवर ठाम राहिले, तर त्यांच्याशी वाटाघाटी न करता अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत काही प्रबळ बंडखोरांची बंडखोरी काबूत आणता येईल. किरकोळ बंडखोरीची दखल न घेण्याचे धोरण भाजपा स्वीकारेल, असे समजते. (प्रतिनिधी)भाजपाकडून चर्चेला सुरुवात झाली असून त्यांच्याकडे आम्ही आता २० नाही तर ३० जागा मागितल्या आहेत. चर्चेअंती किती जागा मिळतील, त्यावरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे.-रामभाऊ तायडे, रिपाइं, ठाणे शहराध्यक्ष, आठवले गट