शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या

By संदीप प्रधान | Updated: December 16, 2024 09:35 IST

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. या विरोधातील कारवाई ही थातुरमातुर अशीच आहे. अनधिकृत बांधकाम करणारे माफिया, सत्ताधारी नेते आणि महापालिकेचे अधिकारी यांचे हितसंबंध जोपर्यंत घट्ट आहेत, घरांची गरज असलेल्यांची संख्या जास्त आणि उपलब्ध परवडणारी स्वस्त घरे कमी असे व्यस्त प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामांची शृखंला पूर्णपणे तोडणे अशक्य आहे. न्यायालयाने फटकारले की, महापालिका तात्पुरती कारवाई करते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या न्यायाने अनधिकृत बांधकामांचे इमले चढतच जातात.

निवारा ही मूलभूत गरज आहे. हजारो लोक रस्त्यावर वास्तव्य करतात. ज्यांना रस्त्यावर राहणे शक्य नाही ते अनधिकृत बांधकामात आसरा घेतात. एकेकाळी अर्बन लँड सिलिंग ॲक्टच्या भीतीने जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर बेकायदा चाळी, इमारती उभ्या केल्या. मुंबई व उपनगरात झोपड्या उभ्या राहण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. ठाणे महापालिका हद्दीत मुंब्रा, कळवा या परिसरात अनेक शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले.  दिव्यात खारफुटी जाळून रातोरात इमारती उभ्या राहिल्या. घोडबंदर रोड येथेही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. देशाचा समन्यायी विकास न झाल्याने उत्तरेकडील अविकसित राज्यातून रोजगारासाठी लोंढे येतात. अनेकांना रोजगार मुंबईत मिळाला तरी वास्तव्याकरिता ते पूर्व वा पश्चिम उपनगरात आसरा घेतात. त्यामुळे वसई-विरार किंवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरात घरांची मागणी वाढली. याचा गैरफायदा भूमाफियांनी उचलला. खासगी, सरकारी अशा सर्वच भूखंडांवर इमारती उभ्या केल्या. 

दंगलीनंतर मुंब्र्यात दाटीवाटी

मुंबईत १९९२-९३ मध्ये दंगल झाली. त्यानंतर मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मुंब्रा परिसरात स्थलांतर झाले. मुंब्र्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून वरवरपर्यंत हजारो झोपड्या उभ्या राहिल्या. मुंब्र्यातील या डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांतून होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पारसिकचा बोगदा धोकादायक झाला. एकेकाळी जलद लोकलची वाहतूक या बोगद्यातून व्हायची. कालांतराने येथील वाहतुकीवर वेगमर्यादा घातल्याने लोकल विलंब होऊ लागला. आता पारसिक बोगद्यातून वाहतूक होत नाही. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचीच वाहतूक होते.

अतिवृष्टीने दिवा बुडाले

मुंबई व उपनगरात २६ जुलै २००५ रोजी ऐतिहासिक पर्जन्यवृष्टी झाली होती. एका दिवसात ९०० ते ११०० मि.मी. पाऊस झाला होता. दिव्यात याच काळात असंख्य अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. मुसळधार पावसामुळे दिव्यातील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अर्थात त्यानंतरही येथील मँनग्रोव्हज जाळून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा भूमाफियांनी सुरू केला. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे घर खरेदी करणे परवडत नाही ते लोक दिव्यात १२ ते २० लाखांत घर खरेदी करतात.

ठाणे महापालिकेने २०१९ ते २०२४ या कालावधीत नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य-सावरकर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा प्रभागात मिळून ५५१० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ठाण्यात लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी असताना सहा वर्षांत झालेली कारवाई किती तुटपुंजी आहे हेच ही आकडेवारी दाखवते.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका