शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या

By संदीप प्रधान | Updated: December 16, 2024 09:35 IST

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. या विरोधातील कारवाई ही थातुरमातुर अशीच आहे. अनधिकृत बांधकाम करणारे माफिया, सत्ताधारी नेते आणि महापालिकेचे अधिकारी यांचे हितसंबंध जोपर्यंत घट्ट आहेत, घरांची गरज असलेल्यांची संख्या जास्त आणि उपलब्ध परवडणारी स्वस्त घरे कमी असे व्यस्त प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामांची शृखंला पूर्णपणे तोडणे अशक्य आहे. न्यायालयाने फटकारले की, महापालिका तात्पुरती कारवाई करते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या न्यायाने अनधिकृत बांधकामांचे इमले चढतच जातात.

निवारा ही मूलभूत गरज आहे. हजारो लोक रस्त्यावर वास्तव्य करतात. ज्यांना रस्त्यावर राहणे शक्य नाही ते अनधिकृत बांधकामात आसरा घेतात. एकेकाळी अर्बन लँड सिलिंग ॲक्टच्या भीतीने जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर बेकायदा चाळी, इमारती उभ्या केल्या. मुंबई व उपनगरात झोपड्या उभ्या राहण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. ठाणे महापालिका हद्दीत मुंब्रा, कळवा या परिसरात अनेक शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले.  दिव्यात खारफुटी जाळून रातोरात इमारती उभ्या राहिल्या. घोडबंदर रोड येथेही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. देशाचा समन्यायी विकास न झाल्याने उत्तरेकडील अविकसित राज्यातून रोजगारासाठी लोंढे येतात. अनेकांना रोजगार मुंबईत मिळाला तरी वास्तव्याकरिता ते पूर्व वा पश्चिम उपनगरात आसरा घेतात. त्यामुळे वसई-विरार किंवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरात घरांची मागणी वाढली. याचा गैरफायदा भूमाफियांनी उचलला. खासगी, सरकारी अशा सर्वच भूखंडांवर इमारती उभ्या केल्या. 

दंगलीनंतर मुंब्र्यात दाटीवाटी

मुंबईत १९९२-९३ मध्ये दंगल झाली. त्यानंतर मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मुंब्रा परिसरात स्थलांतर झाले. मुंब्र्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून वरवरपर्यंत हजारो झोपड्या उभ्या राहिल्या. मुंब्र्यातील या डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांतून होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पारसिकचा बोगदा धोकादायक झाला. एकेकाळी जलद लोकलची वाहतूक या बोगद्यातून व्हायची. कालांतराने येथील वाहतुकीवर वेगमर्यादा घातल्याने लोकल विलंब होऊ लागला. आता पारसिक बोगद्यातून वाहतूक होत नाही. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचीच वाहतूक होते.

अतिवृष्टीने दिवा बुडाले

मुंबई व उपनगरात २६ जुलै २००५ रोजी ऐतिहासिक पर्जन्यवृष्टी झाली होती. एका दिवसात ९०० ते ११०० मि.मी. पाऊस झाला होता. दिव्यात याच काळात असंख्य अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. मुसळधार पावसामुळे दिव्यातील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अर्थात त्यानंतरही येथील मँनग्रोव्हज जाळून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा भूमाफियांनी सुरू केला. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे घर खरेदी करणे परवडत नाही ते लोक दिव्यात १२ ते २० लाखांत घर खरेदी करतात.

ठाणे महापालिकेने २०१९ ते २०२४ या कालावधीत नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य-सावरकर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा प्रभागात मिळून ५५१० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ठाण्यात लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी असताना सहा वर्षांत झालेली कारवाई किती तुटपुंजी आहे हेच ही आकडेवारी दाखवते.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका