शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वादळाने घरांची छपरे उडाली, घराच्या भिंतीही पडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 03:39 IST

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत.

भातसानगर/ खर्डी : शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह संध्याकाळी येणाºया तुरळक पावसामुळे भातसानगरजवळील शेंडेगावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील कौले, पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसासोबत आलेल्या वादळाने शहापूर तालुक्यातील शेंडेगाव आणि वाघवाडी येथील अनेक घरांची छपरे, कौले उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत. वादळामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची पाहणी आ. पांडुरंग बरोरा यांनी करून तहसीलदार रवींद्र बावीस्कर आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जाधव यांना पंचनामा करण्याच्या आणि नुकसानभरपाईच्या सूचना दिल्या आहेत. शेंडेगाव येथील २५ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले असून त्यांनी साठवून ठेवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच विद्युतपोलदेखील पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला आहे. यामुळे या गावाला अंधारात राहावे लागणार आहे. कसारा, शिरोळ, अजनूप आणि भातसानगर परिसरात अनेक घरांचे, पोल्ट्री फॉर्म तसेच विद्युतखांबांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील ज्याज्या गावांतील घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करून त्यांच्या नुकसानभरपाईचे अहवाल शासनाला पाठवण्यात येतील.- रवींद्र बावीस्कर,तहसीलदार, शहापूर 

टॅग्स :thaneठाणेHomeघर