शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

कामाचा ताण नसल्याची मोहन ग्रुपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 02:37 IST

अमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली.

पंकज पाटील ,  अंबरनाथअमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली. मोहन ग्रुपच्या कामाचा आणि आर्थिक व्यवहाराचा कोणताही ताण अमर यांच्यावर नसल्याची भूमिका या चौकशीवेळी जितेंद्र यांनी मांडली. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक कारणांसोबत इतर कारणेही तपासावी लागणार आहेत.अमर भाटिया यांनी मामा हरीश भाटिया यांना एसएमएस करुन आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. पण त्यांनी आत्महत्या करण्याइतपत काय घडले, हे कोडे त्यांच्या निकटवर्तीयांना सुटलेले नाही. आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांची यंत्रणाही कामाला लागली आहे. ठाण्याच्या परमार प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त झाल्याने मोहन ग्रुप या संदर्भात काय खुलासा करेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर पोलीसांनी चौकशीसाठी बुधवारी जितेंद्र यांना बोलावले असता त्यांनी मोहन ग्रुपच्या सर्व आर्थिक व्यवहारांची आणि कामाची माहिती पोलिसांपुढे ठेवली. मोहन ग्रुपचे १२ मोठे प्रकल्प बदलापूरात सुरु असुन सहा हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामाची परवानगी घेणे असो की जागेचा व्यवहार करणे असो या सर्वांसाठी मोहन ग्रुपची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे अमर यांना त्या कामाचा कोणताच ताण नव्हता. सुरु असलेल्या इमारतीच्या कामावर केवळ देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे पोलिसांकडे स्पष्ट करण्यात आले. आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र यंत्रणा होती. मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची कामे सुरू असल्याने आर्थिक चणचणीचा कोणताच प्रश्न मोहन ग्रुपपुढे नव्हता. मोहन ग्रुपचे ते संचालक असल्याने त्यांच्या एकट्यावर कोणतेच मोठी जबाबदारी नव्हती. कंपनीचे काम पाहण्यासाठी १६ संचालकांची टीम काम करीत आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पाला आतापर्यंत कोणतीही अडचण शासनामार्फत किंवा स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत झालेली नाही. सर्व प्रकल्प नियमानुसार असल्याने कोणत्याही तक्रारीला वाव नव्हता. त्यामुळे अमर यांनी आत्महत्या का केली हे कोडे आम्हालाही सुटलेले नाही, असे म्हणणे जितेंद्र यांनी पोलिसांपुढे मांडले. अमर भाटिया यांचे मामा हरी भाटिया हे देखील मोहन ग्रुपमध्ये संचालक असून त्यांनीही कंपनीत कोणताही तणाव नव्हता, याला दुजोरा दिला. असा तणाव निर्माण होण्यास वाव नव्हता, असे म्हणणे त्यांनी पोलीसांसमोर मांडले. सर्व सुरळीत असतांना हा प्रकार घडल्याने आम्हालाही धक्का बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.