शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कामाचा ताण नसल्याची मोहन ग्रुपची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 02:37 IST

अमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली.

पंकज पाटील ,  अंबरनाथअमर भाटिया यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला बुधवारी ख-या अर्थाने सुरुवात झाली असून रेल्वे पोलिसांनी मोहन ग्रूपचे सर्वेसर्वा जितेंद्र मोहनदास यांची चौकशी केली. मोहन ग्रुपच्या कामाचा आणि आर्थिक व्यवहाराचा कोणताही ताण अमर यांच्यावर नसल्याची भूमिका या चौकशीवेळी जितेंद्र यांनी मांडली. त्यामुळे पोलिसांना व्यावसायिक कारणांसोबत इतर कारणेही तपासावी लागणार आहेत.अमर भाटिया यांनी मामा हरीश भाटिया यांना एसएमएस करुन आत्महत्या करीत असल्याचे कळवले होते. पण त्यांनी आत्महत्या करण्याइतपत काय घडले, हे कोडे त्यांच्या निकटवर्तीयांना सुटलेले नाही. आत्महत्येमागचे कारण शोधण्यासाठी पोलिसांची यंत्रणाही कामाला लागली आहे. ठाण्याच्या परमार प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त झाल्याने मोहन ग्रुप या संदर्भात काय खुलासा करेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर पोलीसांनी चौकशीसाठी बुधवारी जितेंद्र यांना बोलावले असता त्यांनी मोहन ग्रुपच्या सर्व आर्थिक व्यवहारांची आणि कामाची माहिती पोलिसांपुढे ठेवली. मोहन ग्रुपचे १२ मोठे प्रकल्प बदलापूरात सुरु असुन सहा हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक कामाची जबाबदारीही वाटून देण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामाची परवानगी घेणे असो की जागेचा व्यवहार करणे असो या सर्वांसाठी मोहन ग्रुपची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे अमर यांना त्या कामाचा कोणताच ताण नव्हता. सुरु असलेल्या इमारतीच्या कामावर केवळ देखरेखीची जबाबदारी त्यांच्यावर होती, असे पोलिसांकडे स्पष्ट करण्यात आले. आर्थिक व्यवहारांसाठी स्वतंत्र यंत्रणा होती. मोठ्या प्रमाणात प्रकल्पाची कामे सुरू असल्याने आर्थिक चणचणीचा कोणताच प्रश्न मोहन ग्रुपपुढे नव्हता. मोहन ग्रुपचे ते संचालक असल्याने त्यांच्या एकट्यावर कोणतेच मोठी जबाबदारी नव्हती. कंपनीचे काम पाहण्यासाठी १६ संचालकांची टीम काम करीत आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पाला आतापर्यंत कोणतीही अडचण शासनामार्फत किंवा स्थानिक शासकीय यंत्रणेमार्फत झालेली नाही. सर्व प्रकल्प नियमानुसार असल्याने कोणत्याही तक्रारीला वाव नव्हता. त्यामुळे अमर यांनी आत्महत्या का केली हे कोडे आम्हालाही सुटलेले नाही, असे म्हणणे जितेंद्र यांनी पोलिसांपुढे मांडले. अमर भाटिया यांचे मामा हरी भाटिया हे देखील मोहन ग्रुपमध्ये संचालक असून त्यांनीही कंपनीत कोणताही तणाव नव्हता, याला दुजोरा दिला. असा तणाव निर्माण होण्यास वाव नव्हता, असे म्हणणे त्यांनी पोलीसांसमोर मांडले. सर्व सुरळीत असतांना हा प्रकार घडल्याने आम्हालाही धक्का बसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.