शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हॉटेलवाल्यांकडून परदेशातून आलेल्या नागरीकांची लुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:26 IST

मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांची आता घरवापसी झाली आहे. परंतु त्यांना विविध ठिकाणच्या हॉटेलमध्ये ठेवले जात असून ठाण्यात दोन हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या नागरीकांकडून हॉटेलवाल्यांनी लुट सुरु केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : परदेशात अडकलेल्या नागरीकांना आता परतीचा प्रवास मोकळा झाला आहे. आता टप्याटप्याने या नागरीकांना भारतात आणले जात आहे. ठाणे, मिरारोड आदी भागातील नागरीकही मागील दोन दिवसापासून ठाण्यात आले आहेत. परंतु ठाण्यात ज्या दोन हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणचे पुढील १४ दिवसांचे भाडे अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे नागरीक आणखीनच संपातले आहेत, त्यातही या ठिकाणी साफसफाई नाही, इतर काही सुविधा योग्यरितीने पुरविल्या जात नसल्याचा आरोपही या रहिवाशांनी केला आहे.             मागील जवळ जवळ दिड महिना परदेशात अडकलेल्या नागरीकांना आता मायदेशी आणले जात आहे. ठाण्यातही त्यानुसार परदेशातून आलेल्यांसाठी दोन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १०० नागरीक ठाण्यात आल्याचे पालिकेचे म्हणने आहे. त्यानुसार या दोन हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. परंतु हॉटेलमध्ये येताच आधी पैसे भरा मगच रुम मिळेल असा तगादा लावला गेला. त्यानंतर पुढील १४ दिवसांचे एका रुमचे भाडे तब्बल ४५ ते ५५ हजार भरावे लागले आहे. मिरारोडमधील एका कुटुबांला मिरारोडला जायचे होते. परंतु त्यांनाही ठाण्यातील हॉटेलमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यात त्यांच्या समवेत एक ६३ वर्षीय वृध्द व्यक्ती असून त्यांना किडणीचा आजार आहे. त्यामुळे मिरारोडला सोडण्यात यावे, तेथील हॉटेलमध्ये आम्ही वास्तव्य करु अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र असे असतांनाही त्यांना आता याच हॉटेलमध्ये वास्तव्यास राहण्यास सांगण्यात आले आहे. परंतु आता त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबातील सदस्य फौजीया नाईक यांनी दिली. त्यात या हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे, मात्र स्वच्छता नाही, साफसफाई नाही, इतर सर्वच सुविधांचा बोजरावा उडाला आहे. त्यातही पिण्याचे पाणी हे विकत घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही पुन्हा भारतात येऊ न चुक केली का? असा सवाल त्यांना सवाल पडला आहे. अशीच परिस्थिती अन्य नागरीकांचीही झाली असून किमान योग्य प्रकारे साफसफाई तरी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान या दोनही हॉटेलकडून लुट सुरु असून त्यानुसार सुविधा देखील दिल्या जात नसल्याचे या नागरीकांचे म्हणने आहे. दोन रुमसाठीच पुढील १४ दिवसांसाठीचे १ ते सव्वा लाखांचे भाडे भरावे लागत असून एवढा पैसा आता आणायचा कुठुन असा सवाल त्यांनी केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhotelहॉटेल