शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

वाहतूककोंडीवर घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:30 IST

दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी महापालिकादेखील जबाबदार असल्याचे नगरसेवकांनी सोदाहरण स्पष्ट केल्यानंतर या विषयावर पालकमंत्री, महापालिका आणि वाहतूक शाखेची संयुक्त बैठक लवकरच घेण्याचा निर्णय महासभेने घेतला.वाहतूककोंडीबाबत महासभेत मांडलेल्या लक्षवेधीदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महापालिकेच्या विविध विभागांमुळे वाहतूकव्यवस्था आणखी विस्कळीत होत असल्याचा आरोप केला. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना महापालिकेने वाहतूकव्यवस्थेचा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. कोणत्याही बांधकामास मंजुरी देताना तिथे पुरेशा पार्किंग व्यवस्थेची खातरजमा महापालिकेने करावी, अशी सूचना त्यांनी केली. आर मॉलची पार्किंग सर्व्हिस रोडवर केली जाते. घोडबंदर ते कोपरी किंवा मुंब्रा ते कळवा यासारख्या वर्दळीच्या रस्त्यांना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनांची गर्दी वाढते. बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना वर्दळीच्या वेळी मज्जाव केल्यास वाहतूक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले. रेतीबंदर भागात महापालिकेने चौपाटीऐवजी वर हँगिंग गार्डन आणि खाली ट्रक टर्मिनस उभारले, तर त्याचाही फायदा वाहतूकव्यवस्थेस होऊ शकतो. लालबहादूर शास्त्री रोडवर जागोजागी अनावश्यक यू टर्न दिले आहेत, त्यामुळेही वाहतूक विस्कळीत होते. तीन पेट्रोलपंप चौक आणि खोपट रोडवर महानगर गॅसपंपामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. मुंब्रा प्रभागात अतिक्रमण फोफावले असून ते हटवल्यास वाहतुकीस मदत होईल, असे शानू पठाण यांनी सुचवले. एका हृदयरोग्याला रेतीबंदर येथून खारेगाव येथील सफायर हॉस्पिटलमध्ये पोहोचवताना वाहतुकीमुळे झालेला विलंब सभागृहामध्ये मांडताना अनिता केणी यांनी ठाणेकर तुझा प्रशासनावर भरवसा नाय काय, हे विडंबनगीत म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहतूककोंडी हा कोणत्या एका पक्षाचा प्रश्न नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सेवा प्रतिष्ठान तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सुचवले.‘लोकमत’च्या बातमीवर चर्चालोकपुरम येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीअभावी वर्षभरापासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले. नगरसेवक सुहास देसाई यांनी सभेत या बातमीचा उल्लेख केला. महत्त्वाच्या कामांमध्ये राजकारण करण्यात अर्थ नाही. अशा प्रकारच्या समस्यांसाठी वृत्तपत्र राजकारण्यांना जबाबदार धरतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.शिवसेनेला घरचा आहेरवाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अशा अनेक गंभीर प्रश्नांवर महासभेमध्ये चर्चा केली जाते. परंतु, यातून काय साध्य होते, असा प्रश्न माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित करून सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला. सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्याला अशा प्रकारे खंत व्यक्त करावी लागते, हे दुर्दैव असल्याचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील म्हणाले. आगीत तेल ओतण्याची त्यांची चाल हेरून नरेश म्हस्के यांनी शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षानेही समर्थ साथ द्यावी, असा टोला लगावला.