शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:58 IST

एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत

डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, एमआयडीसीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.१ जून २०१५ ला २७ गावे पुन्हे केडीएमसीत समाविष्ट झाली. त्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कोणाची, असा यक्षप्रश्न रहिवाशांना पडला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र मालमत्ताकर गोळा करणाºया केडीएमसीचीच रस्तेदुरुस्ती करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत हा संभ्रम दूर केला. त्यानंतरही दुरुस्तीसंदर्भात हालचाली केडीएमसीकडून झालेल्या नाहीत. मध्यंतरी एमआयडीसीतील सेनेच्या पदाधिकºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र पाठवून सत्ता असूनही दुर्लक्षित आहोत, अशा शब्दांत घरचा आहेर दिला होता. तसेच पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. जर याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशाराही या पदाधिकाºयांनी महापौरांना दिला होता. मात्र, त्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली गेली.सध्या निवासी विभागातील शेवटचा बसस्टॉप, भाजीगल्ली, मिलापनगर तलाव रोड, सुदर्शननगर, साईबाबा मंदिर रोड यासह अन्य बहुतांश रस्ते खराब आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.यासंदर्भात केडीएमसी-डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांना संपर्क साधला असता रस्त्यांच्या काही ठिकाणी गटारांची बांधणी झालेली नाही. हे काम एमआयडीसीचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांनी गटार बांधून दिल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे म्हणाले, रस्तेदुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची आहे. गटारबांधणीबाबत विचारले असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Potholeखड्डे