शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

जिल्ह्यातील रस्ते होणार चकाचक;  १३६ साध्या रस्त्यांना व्हिलेज रोडचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:28 AM

जिल्हा परिषदेचा निर्णय

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात असलेल्या छोट्या साध्या रस्त्यांना ठाणे जिल्हा परिषदेने व्हिलेज रोड (व्हीआर) असा दर्जा देऊन त्यांच्या दुुरुस्तीसाठी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये सर्व तालुक्यांमधील १३६ रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे गावखेड्यांचे रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील गावखेड्यांमध्ये असलेले रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. त्यांच्या दुरुस्तीची समस्या उद्भवत असल्यामुळे गावकऱ्यांना या खराब रस्त्यावरूनच येजा करावी लागत असे. यांच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रथम या १३६ रस्त्यांची जिल्हा परिषदेने दर्जोन्नती करून त्यांना व्हीआर दर्जा दिला आहे. यामुळे या कामांसाठी जिल्हा परिषदेला व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनादेखील निधी मंजूर करून त्यावर खर्च करणे शक्य होणार आहे. या ठरावास जिल्हा परिषदेने एकमुखी मंजुरी दिली आहे.भिवंडी तालुक्याला सर्वाधिक लाभ : ५७ रस्त्यांचे रुपडे पालटणारग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील या १३६ रस्त्यांचे आता भाग्य उजळले आहे. त्यांचे दर्जेदार काम करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी ठेकेदारांकडून उत्तम दर्जाचे काम करून घेण्याची गरज सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील ५७ रस्त्यांचा समावेश आहे. यात कोन ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील रस्त्यांसह सरवली, पिंपळनेर, गोकानाका, निंबवली, येवई, वडपे, काशिवली, घोटघर, गणेशपुरी, भेंडीचा पाडा, मालबीडी, मोहिली, आकलोली आदी गावांच्या परिसरातील ५७ रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे. याप्रमाणेच शहापूर तालुक्यामधील चिल्हरवाडी, जांभळवाड, आसनगाव, शेई, मासवणे, टेंभरे, नेहरोली, दहिवली, नांदवळ, किन्हवली, शीळ, दलालपाडा आदी २१ गावांच्या रस्त्यांचा समावेश या दर्जामध्ये केला आहे.मुरबाडचे २८ तर अंबरनाथचे १० रस्ते : या व्हीआर दर्जामध्ये मुरबाड तालुक्यामधील कळंबे, करणे, कुंभेपाडा, दहीपाडा, पारतेळ, रातांदळेपाडा, बिरवाडी, लाहे, करपटवाडी, टेंभुर्ली, करवेळे, वाघिवलीपाडा, ब्राह्मणपाडा, टेंबर, धानिवली, साकुर्ली, गुंडे आदी २८ रस्त्यांचा समावेश आहे. कल्याण तालुक्यातील भिसोळपाडा, वाघेरापाडा आदी तीन रस्त्यांचा तर अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा, आघानवाडी, वडाचीवाडी, चामटोली, ढवळे, वांगणी, ढोके, खारीकपाडा, डोणेगाव, दपिवली, भिनारपाडा, सागाव, बारवी नदी आदी १० रस्त्यांना व्हीआर दर्जा मिळाला आहे.