शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी २५ कोटींऐवजी ४०० कोटी हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:22 IST

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे २५ कोटींचे नियोजन केले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे २५ कोटींचे नियोजन केले आहे. मात्र, तेवढ्यात भागणार नसल्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ४०० कोटी रुपयांचे नियोजन करण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला. या वाढीव निधीतून जिल्ह्यातील रस्ते चकाचक करता येतील, असेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.जिल्ह्यात सुमारे २५ ते ३० कोटी रस्त्यांसाठी मंजूर आहेत, तर साकवसाठी १० कोटींची मंजुरी आहे. या ४० कोटींबरोबर उर्वरित सुमारे ४५ कोटी सीएसपीएसमधून रस्त्यांवर खर्च होतो. या ८५ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात रस्त्यांचे काम दरवर्षी केले जाते. पण, रस्त्यांची रुंदी वाढवण्यासह त्यांचा दर्जा वाढवण्याचा ठराव घेऊन सुमारे ४०० कोटी रुपये जिल्ह्यांच्या रस्त्यांसाठी मागणी करण्याचा आग्रह खासदार, आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केला आहे. जिल्हाभरात सद्य:स्थितीला तीन हजार १०० किमीचे गावरस्ते (व्हीआर) आहेत. या गावरस्त्यांचा इतर जिल्हामार्गांमध्ये (ओडीआर) समावेश करावा आणि या ओडीआरचे मुख्य जिल्हामार्गात (एमडीआर) समावेश करण्याचा ठरावही लोकप्रतिनिधींनी या डीपीसीच्या बैठकीत मांडला होता.सुमारे पाच तेआठ दिवसांनी ठराव घेण्याची मुभा असल्याचे पालकमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास अनुसरून व्हीआरचे ओडीआर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेने करायचा आहे. यानंतर ओडीआरचे एमडीआर करण्याचा ठराव डीपीसीने करून राज्य शासनास सादर करायचा आहे. याशिवाय, आता जिल्ह्यातील सर्व रस्ते आता साडेतीन मीटरचे न करता साडेपाच मीटरचे करण्याचा ठरावही राज्य शासनास पाठवण्याचे निश्चित केले आहे. यानुसार वाढीव निधीसाठी राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात घेतली जाणार आहे. त्यावेळी निधीसाठी शासनाकडे मागण्या करण्याचे पालकमंत्र्यांकडून सांगितले जात आहे. हा वाढीव निधी मिळवून घेण्यासाठी २३ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक असल्याचेही पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिले.>पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणालाराज्यस्तरीय बैठकीत हा वाढीव निधी प्राप्त करण्यासाठी आता पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या २०१९-२० च्या वार्षिक विकास निधीच्या सुयोग्य व प्रभावी अंमलबजावणीसाठी पाच उपसमित्यादेखील गठीत केल्या जाणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील विकासाचा आराखडा तयार होईल. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचीदेखील नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार जिल्ह्यातील विकास निधी खर्च होणार आहे. उपसमित्या गठीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे. मात्र, तज्ज्ञ व्यक्तींची निवड होण्यास विलंब लागणार असल्याचे सांगितले जात आहे.