शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी २५ कोटींऐवजी ४०० कोटी हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:22 IST

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे २५ कोटींचे नियोजन केले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे २५ कोटींचे नियोजन केले आहे. मात्र, तेवढ्यात भागणार नसल्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी ४०० कोटी रुपयांचे नियोजन करण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केला. या वाढीव निधीतून जिल्ह्यातील रस्ते चकाचक करता येतील, असेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.जिल्ह्यात सुमारे २५ ते ३० कोटी रस्त्यांसाठी मंजूर आहेत, तर साकवसाठी १० कोटींची मंजुरी आहे. या ४० कोटींबरोबर उर्वरित सुमारे ४५ कोटी सीएसपीएसमधून रस्त्यांवर खर्च होतो. या ८५ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात रस्त्यांचे काम दरवर्षी केले जाते. पण, रस्त्यांची रुंदी वाढवण्यासह त्यांचा दर्जा वाढवण्याचा ठराव घेऊन सुमारे ४०० कोटी रुपये जिल्ह्यांच्या रस्त्यांसाठी मागणी करण्याचा आग्रह खासदार, आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केला आहे. जिल्हाभरात सद्य:स्थितीला तीन हजार १०० किमीचे गावरस्ते (व्हीआर) आहेत. या गावरस्त्यांचा इतर जिल्हामार्गांमध्ये (ओडीआर) समावेश करावा आणि या ओडीआरचे मुख्य जिल्हामार्गात (एमडीआर) समावेश करण्याचा ठरावही लोकप्रतिनिधींनी या डीपीसीच्या बैठकीत मांडला होता.सुमारे पाच तेआठ दिवसांनी ठराव घेण्याची मुभा असल्याचे पालकमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. लोकप्रतिनिधींच्या आग्रहास अनुसरून व्हीआरचे ओडीआर करण्याचा ठराव जिल्हा परिषदेने करायचा आहे. यानंतर ओडीआरचे एमडीआर करण्याचा ठराव डीपीसीने करून राज्य शासनास सादर करायचा आहे. याशिवाय, आता जिल्ह्यातील सर्व रस्ते आता साडेतीन मीटरचे न करता साडेपाच मीटरचे करण्याचा ठरावही राज्य शासनास पाठवण्याचे निश्चित केले आहे. यानुसार वाढीव निधीसाठी राज्यस्तरीय बैठक मंत्रालयात घेतली जाणार आहे. त्यावेळी निधीसाठी शासनाकडे मागण्या करण्याचे पालकमंत्र्यांकडून सांगितले जात आहे. हा वाढीव निधी मिळवून घेण्यासाठी २३ जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक असल्याचेही पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिले.>पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणालाराज्यस्तरीय बैठकीत हा वाढीव निधी प्राप्त करण्यासाठी आता पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या २०१९-२० च्या वार्षिक विकास निधीच्या सुयोग्य व प्रभावी अंमलबजावणीसाठी पाच उपसमित्यादेखील गठीत केल्या जाणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील विकासाचा आराखडा तयार होईल. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचीदेखील नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार जिल्ह्यातील विकास निधी खर्च होणार आहे. उपसमित्या गठीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे. मात्र, तज्ज्ञ व्यक्तींची निवड होण्यास विलंब लागणार असल्याचे सांगितले जात आहे.