शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रस्तेदुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:45 IST

नागरिकांचा विरोध : आता आठवले काम?

अंबरनाथ : अंबरनाथ मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता पालिकेने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या या रस्तादुरुस्तीला आता नागरिकच विरोध करत आहेत. निवडणुका जवळ आल्याने त्यांना रस्त्याची दुरुस्ती आठवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर, पालिकेने हे काम नियमित कामापैकी एक असल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करणे अवघड जात होते. मात्र, आता गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नगरपालिकेने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. आचारसंहितेच्या काळात कोणतेही काम करता येत नाही, याची जाणीव असतानाही शहरातील रस्त्यांचे काम सुरू आहे. या रस्तेदुरुस्तीवरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहे. विरोधक रस्तेदुरुस्तीला विरोध करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तर, विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर आरोप करून एवढे दिवस जे केले नाही, ते काम निवडणुकीच्या आधी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आपल्या चुका लपविण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप होत आहे.

या रस्त्यांसोबतच लोकनगरी रस्त्याची अवस्थाही बिकट असल्याने या रस्त्यावरही डांबरीकरण केले जात होते. मात्र, ते काम स्थानिकांनीच रोखले. निवडणुका आल्यावर रस्तेदुरुस्तीचे सोंग केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना हे काम जून महिन्यात देण्यात आलेल्या कामाचाच एक भाग आहे. त्यामुळे या कामाला आचारसंहितेचा अडथळा येत नाही. मात्र, काही रस्त्यांचे काम करणे आवश्यक असले, तरी ते काम २१ आॅक्टोबरनंतर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.