शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: October 12, 2016 04:19 IST

डोंबिवली औद्योगिक परिसरात ५०० कारखाने कार्यरत असून या कारखानदारांकडून कल्याण-डोंबिवली महापालिका मालमत्ता कर वसूल करते. औद्योगिक विकास महामंडळाकडून

मुरलीधर भवार / डोंबिवलीडोंबिवली औद्योगिक परिसरात ५०० कारखाने कार्यरत असून या कारखानदारांकडून कल्याण-डोंबिवली महापालिका मालमत्ता कर वसूल करते. औद्योगिक विकास महामंडळाकडून सेवाकर वसूल केला जातो. मात्र हे दोन्ही कर वसूल करुनही औद्योगिक परिसरात नागरी सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे.औद्योगिक विकास महामंडळ व महापालिका यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उद्योजकांना कोणी वालीच नाही, अशी अवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मिलापनगरहून फेज नंबर दोनकडे जाणारा रस्ता अत्यंत खरा झाला आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. शिवाजीनगर उद्योगापासून फेज दोनकडे जाणारा रस्ता अत्यंत वाईट आहे. सोनारपाडा येथून जाणाऱ्या रस्त्याची देखील चाळण झाली आहे. त्याकडे उद्योजक व उद्योजकांची संघटना वारंवार लक्ष वेधण्याचे काम करीत आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे महापालिका व औद्योगिक विकास महामंडळाचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील रहिवासी, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांनाही या खराब रस्त्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. कारखान्यात माल घेऊन येणाऱ्या मालवाहू गाड्या, कंटेनर या रस्त्यातील खड्डे व चिखलात रुततात. रस्त्यावरील पथ दिवे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करुन दिले जात नसल्याची तक्रार डोंबिवलीतील उद्योजक मिलिंद केळकर यांनी केली. उद्योजकांची ‘कामा’ संघटना आणि महापालिका व एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेतली जात नसल्याने अनेक प्रश्न सुटत नाहीत.नकारात्मक नोकरशाहीचा फटकाडोंबिवली औद्योगिक वसाहतीची जबाबदारी नकारात्मक मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांवर सोपवली जाते. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या येथील अधिकाऱ्यांच्या तोंडी ‘अहो, माझी दोन-तीन वर्षे नोकरी राहिली आहे. मी काय करणार’, अशी नकारात्मक भाषा असते. सध्याचे कार्यकारी अभियंता सुभाष तुपे हे माध्यमांशी थेट बोलण्याचे टाळतात. कायम व्यस्त असल्याचे तुपे सांगत असले तरी औद्योगिक क्षेत्रातील समस्या तसूभरही सुटलेल्या नाहीत हे वास्तव आहे. डोंबिवली औद्योगिक महामंडळाचे कार्यालय हे अधिकाऱ्यांची ‘रेस्ट रुम’ म्हणून उद्योजकांमध्ये ओळखले जाते.(प्रतिनिधी)सरकारच्या धरसोडीमुळे सुविधांची बोंबऔद्योगिक विकास क्षेत्र हे २००२ साली महापालिका हद्दीत होते. त्याच वर्षी २७ गावे वेगळी झाल्याने औद्योगिक क्षेत्र हे त्या गावांच्या हद्दीत ठेवले गेले. ग्रामपंचायती २००२ पासून मालमत्ता कर वसूल करीत होत्या. त्यांचा आर्थिक जीव छोटा असल्याने ग्रामपंचायतीकडून मोठी रस्ते विकासाची कामे हाती घेतली जात नव्हती. च्पुन्हा सरकारने १ जून २०१५ रोजी २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र महापालिकेत आले. परिणामी कारखानदारांना सेवासुविधा देण्याची जबाबदारी महापालिका व महामंडळाची आहे. महापालिका म्हणते की, आम्हाला औद्योगिक विभाग अद्याप हस्तांतरीत करण्यात आलेला नाही तर महामंडळाकडे विचारणा केल्यास ते काखा वर करीत आहेत.