शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: October 12, 2016 04:19 IST

डोंबिवली औद्योगिक परिसरात ५०० कारखाने कार्यरत असून या कारखानदारांकडून कल्याण-डोंबिवली महापालिका मालमत्ता कर वसूल करते. औद्योगिक विकास महामंडळाकडून

मुरलीधर भवार / डोंबिवलीडोंबिवली औद्योगिक परिसरात ५०० कारखाने कार्यरत असून या कारखानदारांकडून कल्याण-डोंबिवली महापालिका मालमत्ता कर वसूल करते. औद्योगिक विकास महामंडळाकडून सेवाकर वसूल केला जातो. मात्र हे दोन्ही कर वसूल करुनही औद्योगिक परिसरात नागरी सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली आहे.औद्योगिक विकास महामंडळ व महापालिका यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे उद्योजकांना कोणी वालीच नाही, अशी अवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मिलापनगरहून फेज नंबर दोनकडे जाणारा रस्ता अत्यंत खरा झाला आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. शिवाजीनगर उद्योगापासून फेज दोनकडे जाणारा रस्ता अत्यंत वाईट आहे. सोनारपाडा येथून जाणाऱ्या रस्त्याची देखील चाळण झाली आहे. त्याकडे उद्योजक व उद्योजकांची संघटना वारंवार लक्ष वेधण्याचे काम करीत आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे महापालिका व औद्योगिक विकास महामंडळाचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथील रहिवासी, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांनाही या खराब रस्त्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. कारखान्यात माल घेऊन येणाऱ्या मालवाहू गाड्या, कंटेनर या रस्त्यातील खड्डे व चिखलात रुततात. रस्त्यावरील पथ दिवे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करुन दिले जात नसल्याची तक्रार डोंबिवलीतील उद्योजक मिलिंद केळकर यांनी केली. उद्योजकांची ‘कामा’ संघटना आणि महापालिका व एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेतली जात नसल्याने अनेक प्रश्न सुटत नाहीत.नकारात्मक नोकरशाहीचा फटकाडोंबिवली औद्योगिक वसाहतीची जबाबदारी नकारात्मक मानसिकता असलेल्या अधिकाऱ्यांवर सोपवली जाते. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या येथील अधिकाऱ्यांच्या तोंडी ‘अहो, माझी दोन-तीन वर्षे नोकरी राहिली आहे. मी काय करणार’, अशी नकारात्मक भाषा असते. सध्याचे कार्यकारी अभियंता सुभाष तुपे हे माध्यमांशी थेट बोलण्याचे टाळतात. कायम व्यस्त असल्याचे तुपे सांगत असले तरी औद्योगिक क्षेत्रातील समस्या तसूभरही सुटलेल्या नाहीत हे वास्तव आहे. डोंबिवली औद्योगिक महामंडळाचे कार्यालय हे अधिकाऱ्यांची ‘रेस्ट रुम’ म्हणून उद्योजकांमध्ये ओळखले जाते.(प्रतिनिधी)सरकारच्या धरसोडीमुळे सुविधांची बोंबऔद्योगिक विकास क्षेत्र हे २००२ साली महापालिका हद्दीत होते. त्याच वर्षी २७ गावे वेगळी झाल्याने औद्योगिक क्षेत्र हे त्या गावांच्या हद्दीत ठेवले गेले. ग्रामपंचायती २००२ पासून मालमत्ता कर वसूल करीत होत्या. त्यांचा आर्थिक जीव छोटा असल्याने ग्रामपंचायतीकडून मोठी रस्ते विकासाची कामे हाती घेतली जात नव्हती. च्पुन्हा सरकारने १ जून २०१५ रोजी २७ गावे महापालिकेत समाविष्ट केली. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र महापालिकेत आले. परिणामी कारखानदारांना सेवासुविधा देण्याची जबाबदारी महापालिका व महामंडळाची आहे. महापालिका म्हणते की, आम्हाला औद्योगिक विभाग अद्याप हस्तांतरीत करण्यात आलेला नाही तर महामंडळाकडे विचारणा केल्यास ते काखा वर करीत आहेत.