शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

इमानदारीचा ‘रस्ता’ पुरात गेला नाही वाहून, उत्तम कामामुळे खड्डे पडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:49 IST

दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते.

- पंकज पाटीलअंबरनाथ : सध्या रस्त्यांवरील खड्डे हे टीकेचा विषय झाले असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडतात, असे सरधोपट कारण बहुतांश महापालिकांचे प्रशासन, रस्ते कंत्राटदार देत आहेत. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला असेल, तर तीन दिवस पुराच्या पाण्याखाली असलेल्या रस्त्याला एकही खड्डा पडत नाही, हे बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याने सिद्ध केले आहे.दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते. तीन दिवस रस्ता पाण्याखाली असतानाही त्या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यामुळे एवढ्या प्रलयानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी आजही सुरळीत सुरू आहे.कल्याण-बदलापूर-कर्जत राज्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली असून या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होेते. बदलापूर ते कर्जत हा मार्ग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होता. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने आजही हा रस्ता सुस्थितीत आहे. कामाचा दर्जा उत्तम राखणे, याचा अर्थ अस्फाल्टचे प्रमाण योग्य असणे, खडी चांगल्या दर्जाची वापरणे, पावसाच्या पाण्यामुळे डांबर सुटून बाहेर येऊ नये, याकरिता वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे प्रमाण योग्य प्रमाणात वापरणे आदी बाबींची काळजी घेणे, हे होय. त्यामुळेच वांगणी ते बदलापूरपर्यंतचा रस्ता आजही टिकून राहिला आहे. महापुरात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आला होता. चामटोली ते कासगाव हा रस्ता तर तीन दिवस पाण्याखाली होता.नदीचा प्रवाह वेगाने या रस्त्यावरून वाहत असतानाही हा रस्ता टिकून राहिला. हाच या रस्त्याची बांधणी उत्तम दर्जाची झाल्याचा पुरावा आहे. एवढा मोठा पूर सहन केल्यावरही या रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, हा विषय या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, बदलापूर-कर्जत रस्ता हा नेमका त्याच्या दर्जामुळे चर्चेत आला आहे. पुण्याच्या दिशेकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अनेक वाहनचालक करतात.पूर्वी हा रस्ता खराब असल्याने नागरिक शीळफाटा किंवा तळोजामार्गे पुण्याकडे जात होते. मात्र, आजही बदलापूर-कर्जत रस्ता सुस्थितीत असल्याने अनेक वाहनचालक याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणे सुरक्षित समजत आहेत.बदलापूर-कर्जत रस्त्याचे काम करताना पावसाचे पाणी रस्त्यावर थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. रस्त्याला योग्य ठिकाणी उतार दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नाही. मात्र, तीन दिवस पाण्याखाली राहूनदेखील हा रस्ता कोठेच खचलेला नाही किंवा रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत. डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य ठेवल्यास रस्ता टिकतो, हे या रस्त्याकडे पाहिल्यावर निश्चित कळते.- किसन कथोरे, आमदार, भाजप

टॅग्स :thaneठाणे