शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

इमानदारीचा ‘रस्ता’ पुरात गेला नाही वाहून, उत्तम कामामुळे खड्डे पडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:49 IST

दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते.

- पंकज पाटीलअंबरनाथ : सध्या रस्त्यांवरील खड्डे हे टीकेचा विषय झाले असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडतात, असे सरधोपट कारण बहुतांश महापालिकांचे प्रशासन, रस्ते कंत्राटदार देत आहेत. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला असेल, तर तीन दिवस पुराच्या पाण्याखाली असलेल्या रस्त्याला एकही खड्डा पडत नाही, हे बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याने सिद्ध केले आहे.दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते. तीन दिवस रस्ता पाण्याखाली असतानाही त्या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यामुळे एवढ्या प्रलयानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी आजही सुरळीत सुरू आहे.कल्याण-बदलापूर-कर्जत राज्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली असून या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होेते. बदलापूर ते कर्जत हा मार्ग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होता. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने आजही हा रस्ता सुस्थितीत आहे. कामाचा दर्जा उत्तम राखणे, याचा अर्थ अस्फाल्टचे प्रमाण योग्य असणे, खडी चांगल्या दर्जाची वापरणे, पावसाच्या पाण्यामुळे डांबर सुटून बाहेर येऊ नये, याकरिता वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे प्रमाण योग्य प्रमाणात वापरणे आदी बाबींची काळजी घेणे, हे होय. त्यामुळेच वांगणी ते बदलापूरपर्यंतचा रस्ता आजही टिकून राहिला आहे. महापुरात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आला होता. चामटोली ते कासगाव हा रस्ता तर तीन दिवस पाण्याखाली होता.नदीचा प्रवाह वेगाने या रस्त्यावरून वाहत असतानाही हा रस्ता टिकून राहिला. हाच या रस्त्याची बांधणी उत्तम दर्जाची झाल्याचा पुरावा आहे. एवढा मोठा पूर सहन केल्यावरही या रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, हा विषय या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, बदलापूर-कर्जत रस्ता हा नेमका त्याच्या दर्जामुळे चर्चेत आला आहे. पुण्याच्या दिशेकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अनेक वाहनचालक करतात.पूर्वी हा रस्ता खराब असल्याने नागरिक शीळफाटा किंवा तळोजामार्गे पुण्याकडे जात होते. मात्र, आजही बदलापूर-कर्जत रस्ता सुस्थितीत असल्याने अनेक वाहनचालक याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणे सुरक्षित समजत आहेत.बदलापूर-कर्जत रस्त्याचे काम करताना पावसाचे पाणी रस्त्यावर थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. रस्त्याला योग्य ठिकाणी उतार दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नाही. मात्र, तीन दिवस पाण्याखाली राहूनदेखील हा रस्ता कोठेच खचलेला नाही किंवा रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत. डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य ठेवल्यास रस्ता टिकतो, हे या रस्त्याकडे पाहिल्यावर निश्चित कळते.- किसन कथोरे, आमदार, भाजप

टॅग्स :thaneठाणे