शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

इमानदारीचा ‘रस्ता’ पुरात गेला नाही वाहून, उत्तम कामामुळे खड्डे पडले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 00:49 IST

दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते.

- पंकज पाटीलअंबरनाथ : सध्या रस्त्यांवरील खड्डे हे टीकेचा विषय झाले असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडतात, असे सरधोपट कारण बहुतांश महापालिकांचे प्रशासन, रस्ते कंत्राटदार देत आहेत. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला असेल, तर तीन दिवस पुराच्या पाण्याखाली असलेल्या रस्त्याला एकही खड्डा पडत नाही, हे बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याने सिद्ध केले आहे.दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते. तीन दिवस रस्ता पाण्याखाली असतानाही त्या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यामुळे एवढ्या प्रलयानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी आजही सुरळीत सुरू आहे.कल्याण-बदलापूर-कर्जत राज्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली असून या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होेते. बदलापूर ते कर्जत हा मार्ग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होता. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने आजही हा रस्ता सुस्थितीत आहे. कामाचा दर्जा उत्तम राखणे, याचा अर्थ अस्फाल्टचे प्रमाण योग्य असणे, खडी चांगल्या दर्जाची वापरणे, पावसाच्या पाण्यामुळे डांबर सुटून बाहेर येऊ नये, याकरिता वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे प्रमाण योग्य प्रमाणात वापरणे आदी बाबींची काळजी घेणे, हे होय. त्यामुळेच वांगणी ते बदलापूरपर्यंतचा रस्ता आजही टिकून राहिला आहे. महापुरात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आला होता. चामटोली ते कासगाव हा रस्ता तर तीन दिवस पाण्याखाली होता.नदीचा प्रवाह वेगाने या रस्त्यावरून वाहत असतानाही हा रस्ता टिकून राहिला. हाच या रस्त्याची बांधणी उत्तम दर्जाची झाल्याचा पुरावा आहे. एवढा मोठा पूर सहन केल्यावरही या रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, हा विषय या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, बदलापूर-कर्जत रस्ता हा नेमका त्याच्या दर्जामुळे चर्चेत आला आहे. पुण्याच्या दिशेकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अनेक वाहनचालक करतात.पूर्वी हा रस्ता खराब असल्याने नागरिक शीळफाटा किंवा तळोजामार्गे पुण्याकडे जात होते. मात्र, आजही बदलापूर-कर्जत रस्ता सुस्थितीत असल्याने अनेक वाहनचालक याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणे सुरक्षित समजत आहेत.बदलापूर-कर्जत रस्त्याचे काम करताना पावसाचे पाणी रस्त्यावर थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. रस्त्याला योग्य ठिकाणी उतार दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नाही. मात्र, तीन दिवस पाण्याखाली राहूनदेखील हा रस्ता कोठेच खचलेला नाही किंवा रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत. डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य ठेवल्यास रस्ता टिकतो, हे या रस्त्याकडे पाहिल्यावर निश्चित कळते.- किसन कथोरे, आमदार, भाजप

टॅग्स :thaneठाणे