शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 21:57 IST

परिसरातील रहिवासी त्रस्त

ठळक मुद्देनांदिवलीच्या स्वामी समर्थ नगरमधील रस्त्यावर डेब्रीजचा भराव टाकून घाण पाण्यातून पायवाट करण्यात आली

डोंबिवली: नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ नगरमधील स्वामींच्या मठानजीकच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात येथील रस्ता पाण्याखाली गेला असतांनाच आता तर त्या ठिकाणी चिखल, घाण जमा झाल्याने रहिवाश्यांची गैरसोय झाली आहे. या दुरावस्थेमधून बाहेर काढा अशी मागणी परिसरातील रहिवाश्यांनी केली.

इमारतीपर्यंत जाण्यासाठी रहिवाश्यांनी विविध ठिकाणी झालेल्या बांधकामांचे डेब्रीज टाकुन पायवाट केली आहे. तर काहींनी इमारतीसमोरच्या गेटबाहेर कोबा इमारतीत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्याला ओबडधोबड पणा आला आहे. ज्या इमारतींसमोर, स्वामींच्या मठासमोर जेथे भराव टाकलेला नाही, तेथे घाण पाणी साचलेले आहे. त्याचा त्रास रहिवाश्यांना होत असून घाण पाण्यामुळे रोगराईची शक्यता आहे. पाणी साचल्यानंतर तेथे गाळ जमा झाला असून परिसरातच कच-याच्या बादल्या ठेवल्या जातात. त्या वेळेत उचलल्या नाहीतर डास, माशांचा प्रार्दुभाव होत असल्याने पादचारी त्रस्त आहेत. अशा स्थितीत त्या ठिकाणी महापालिकेने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. मे महिन्यात त्या ठिकाणी दगडमातीचा रस्ता तयार करण्यात आला, पण तो अर्धवट केल्याने ते काम करुन न केल्यासारखे झाले आहे. ते काम दर्जात्मक व्हावे अशी मागणी नागरिकांनी तेव्हाच केली होती. तसे असतांनाही काम मात्र झाले नाही. श्री स्वामी समर्थ मठाचे कार्यवाह सुरेंद्र खाचणे यांनी त्यावेळीच रस्त्याची रुंदी वाढवावी आणि सगळयांची सोय करावी अशी मागणी केली होती, परंतू ती मागणी कागदावरच राहील्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आता तरी चांगला भराव टाकून नागरिकांची, भक्तांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली. तसेच चिखल, गाळ तातडीने उचलावा, जेथे पाणी साचले आहे तेथे जंतूनाशक फवारणी करावी, आणि डिडिटी पावडरची फवारणी करावी, धूर फवारणी क्वचीतच होते त्यात सातत्य हवे अशी मागणी करण्यात आली. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकdombivaliडोंबिवली