शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

‘पुरात दोरी पकडून रस्ता ओलांडा’, ठामपाचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:28 IST

शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते.

ठाणे : शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी त्यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ७५ टक्केच सफाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित २५ टक्के कामे केव्हा पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. संतापजनक प्रकार म्हणजे नितीन कंपनी, किसननगर भागात पावसाच्या पुरात रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी खांब उभारून त्याला दोरी बांधावी, आणि ती धरून नागरिकांनी रस्ता ओलांडावा, असा अजब सल्ला महापालिकेने दिला आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना ठाण्यात सुरुवात झाली. ही कामे कुठवर आली आहेत, याची पाहणी बुधवारी आयुक्त जयस्वाल यांनी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तीनहातनाका, मॉडेला चेकनाका, किसननगर, साठेनगर, सावरकरनगर, नितीन कंपनी या परिसरात पाहणी केली. त्यानुसार, कामे ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत ती समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.>सफाई कामगारांच्या सुरक्षेची पोलखोलमान्सूनपूर्वी ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईची लगबग सुरू आहे. पावसाचे पाणी सहज आणि पटकन वाहून जावे, यासाठी नाल्यातील गाळ, कचरा काढण्यात येतो. मात्र, नाल्यात उतरून सफाई करणारे कामगार हातमोज्यांऐवजी प्लास्टिक पिशव्या घालून काम करत असल्याचे या सफाई दरम्यान निदर्शनासआले. तर, काही ठिकाणी कर्मचारी चक्क पोहत असताना आयुक्तांच्या पाहणी दौºयात दिसले. ठेकेदारांकडून सफाई कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेच्या हद्दीत शहराची स्वच्छता करणारे महापालिकेचे सुमारे ८०० हून अधिक सफाई कामगार काम करतात. पावसाळ्याच्या तोंडावर सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना गटारांमधील गाळ काढण्याचे काम दिले आहे. ते करताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी हातमोजे घालणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना त्यांना तोंडावर लावण्यासाठी मास्कदेखील नसल्याची गंभीर बाब बुधवारी आयुक्तांच्या दौºयाप्रसंगी माध्यमांच्या लक्षात आली.>संरक्षक भिंतीअभावी माती पुन्हा नाल्यातमेट्रोच्या कामामुळे पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा ठेवावी, अशा सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना दिल्या.तीनहातनाका येथील पनामा कंपनीजवळील नाल्याची सुरुवातीला पाहणी केली. या नाल्यातील कचरा काढण्यात आला आहे. मात्र, या नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने बाजूची माती नाल्यात पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नाल्यात मातीचा गाळ साचून पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सावरकरनगर आणि साठेनगर भागातील नाल्यात कचºयाचे ढीग असून ते काढण्याचे काम सुरू होते. येथे रोबोट मशीनच्या साहाय्याने कचरा काढण्यात येत होता.