शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘पुरात दोरी पकडून रस्ता ओलांडा’, ठामपाचा अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:28 IST

शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते.

ठाणे : शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी त्यांनी नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ७५ टक्केच सफाई झाल्याचे समोर आले. त्यामुळे उर्वरित २५ टक्के कामे केव्हा पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. संतापजनक प्रकार म्हणजे नितीन कंपनी, किसननगर भागात पावसाच्या पुरात रस्ता ओलांडण्यासाठी लोखंडी खांब उभारून त्याला दोरी बांधावी, आणि ती धरून नागरिकांनी रस्ता ओलांडावा, असा अजब सल्ला महापालिकेने दिला आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना ठाण्यात सुरुवात झाली. ही कामे कुठवर आली आहेत, याची पाहणी बुधवारी आयुक्त जयस्वाल यांनी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तीनहातनाका, मॉडेला चेकनाका, किसननगर, साठेनगर, सावरकरनगर, नितीन कंपनी या परिसरात पाहणी केली. त्यानुसार, कामे ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत ती समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.>सफाई कामगारांच्या सुरक्षेची पोलखोलमान्सूनपूर्वी ठाणे महापालिका हद्दीत नालेसफाईची लगबग सुरू आहे. पावसाचे पाणी सहज आणि पटकन वाहून जावे, यासाठी नाल्यातील गाळ, कचरा काढण्यात येतो. मात्र, नाल्यात उतरून सफाई करणारे कामगार हातमोज्यांऐवजी प्लास्टिक पिशव्या घालून काम करत असल्याचे या सफाई दरम्यान निदर्शनासआले. तर, काही ठिकाणी कर्मचारी चक्क पोहत असताना आयुक्तांच्या पाहणी दौºयात दिसले. ठेकेदारांकडून सफाई कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. ठाणे महापालिकेच्या हद्दीत शहराची स्वच्छता करणारे महापालिकेचे सुमारे ८०० हून अधिक सफाई कामगार काम करतात. पावसाळ्याच्या तोंडावर सध्या या सर्व कर्मचाऱ्यांना गटारांमधील गाळ काढण्याचे काम दिले आहे. ते करताना आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी हातमोजे घालणे बंधनकारक आहे. तसेच काम करताना त्यांना तोंडावर लावण्यासाठी मास्कदेखील नसल्याची गंभीर बाब बुधवारी आयुक्तांच्या दौºयाप्रसंगी माध्यमांच्या लक्षात आली.>संरक्षक भिंतीअभावी माती पुन्हा नाल्यातमेट्रोच्या कामामुळे पाणी साचून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एमएमआरडीएने स्वतंत्र आपत्कालीन यंत्रणा ठेवावी, अशा सूचना त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाºयांना दिल्या.तीनहातनाका येथील पनामा कंपनीजवळील नाल्याची सुरुवातीला पाहणी केली. या नाल्यातील कचरा काढण्यात आला आहे. मात्र, या नाल्याभोवती संरक्षक भिंत नसल्याने बाजूची माती नाल्यात पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नाल्यात मातीचा गाळ साचून पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सावरकरनगर आणि साठेनगर भागातील नाल्यात कचºयाचे ढीग असून ते काढण्याचे काम सुरू होते. येथे रोबोट मशीनच्या साहाय्याने कचरा काढण्यात येत होता.