शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्योजकांनी दोन लाख खर्चून तयार केला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:33 IST

एमआयडीसीतील खराब रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्यांवर अडकून पडतात, अनेकदा नादुरुस्तही होतात.

अनिकेत घमंडी डोंबिवली : एमआयडीसीतील खराब रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्यांवर अडकून पडतात, अनेकदा नादुरुस्तही होतात. अपघातांचीही भीती असते. त्याचबरोबर धुळीमुळे कामगारांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने ते गैरहजर राहतात. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. शिवाय, महापालिका आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधूनही काहीच फरक न पडल्याने एमआयडीसी फेज-२ मधील सहा उद्योजकांनी एकत्र येत त्यांच्या प्रवेशद्वारांसमोरील रस्ता स्वखर्चाने तयार करण्यास सुरुवात केली आहे.कारखानदारांच्या ‘कामा’ संस्थेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी ही माहिती दिली. रस्त्याच्या डागडुजीसाठी सोनारपाडा, टेम्पोनाकानजीकच्या एमआयडीसी फेज २ मधील ओमेगा फाइन, डेक्कन, अमूदन केमिकल्स, सप्तवरणा केमिकल्स, लिंक बल्क केमिकल्स, पल्लवी एंटरप्राइज या कंपन्यांच्या उद्योजकांनी पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले. खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी ‘कामा’ने एमआयडीसी, महापालिकेकडे पत्रव्यवहार केला. पण, २०१५ पासून आतापर्यंत टोलवाटोलवी करण्यात यंत्रणांनी वेळ मारून नेली. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे उद्योजक अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे अखेरीस उद्योजकांनी स्वर्चाने रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. दोन लाख रुपये खर्चून १५० मीटर लांब व सात मीटर रुंद अशा रस्त्यावर लहानमोठी खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केल्याचे सोनी म्हणाले. यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात प्रथमच लघुउद्योजकांनी अशा प्रकारे नवीन पायंडा पाडला असावा, असे ते म्हणाले. केडीएमसीने एलबीटी, स्टोअरेज लायसन्स फी आणि वाढीव प्रॉपर्टी टॅक्स, अशी नानाविध करवसुलीची सक्ती केली. परंतु, सुविधा पुरवण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते हा एक चर्चेचा विषय आहे. पण, यंत्रणा मात्र काही करत नाहीत, त्यामुळे उद्योग आणि उद्योजक यात भरडले जात आहेत. निदान यापुढे तरी संबंधित यंत्रणांनी त्यांची जबाबदारी ओळखून त्वरित उर्वरित रस्त्यांची दर्जेदार कामे हाती घ्यावीत आणि उद्योजक, कामगार, रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सोनी यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्वखर्चाने रस्ता तयार करणाºया उद्योजकांचे अन्य उद्योजकांकडून कौतुक होत आहे. यासंदर्भात महापालिका वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, एमआयडीसीने त्या भागातील रस्त्यांवर गटारांची कामे पूर्ण केलेली नाहीत. तसेच रस्ते अजून महापालिकेला हस्तांतरित केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.।२७ गावे केडीएमसीत २०१५ मध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे एमआयडीसी भागातील रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे. रहिवासी आणि उद्योजकांकडून सगळ्या प्रकारचा कर तेच वसूल करत आहेत. तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून ज्या भागांत गटारांची कामे झाली आहेत, तेथील रस्त्यांच्या कामांचा महापालिका कधी शुभारंभ करणार, हे आम्ही कसे सांगणार, ते त्यांनी ठरवावे.- संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी