शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुलाच्या गडरला ट्रकची धडक,बंद झालेली वहातूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:39 IST

भिवंडी : दोन दिवसांपुर्वी सुरू झालेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या बागेफिरदोस येथील गडरला ट्रकने सोमवारी सायंकाळी धडक दिल्याने पुलावरील वहातूक पुन्हा दोन तास बंद पडली. पुलावरील वहातूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले तर या घटनेची महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला दोन तासापर्यंत माहिती नव्हती. नागरिकांनी पुढाकार घेऊन तुटलेले गडर बाजूला काढून पुन्हा वहातूक सुरू ...

ठळक मुद्देउड्डाणपुलाच्या गडरला ट्रकने दिली धडकट्रकचालक दारूच्या नशेत लोकांचा आरोपघटनेच्या वेळी सुरक्षा रक्षक गायब?

भिवंडी: दोन दिवसांपुर्वी सुरू झालेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या बागेफिरदोस येथील गडरला ट्रकने सोमवारी सायंकाळी धडक दिल्याने पुलावरील वहातूक पुन्हा दोन तास बंद पडली. पुलावरील वहातूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले तर या घटनेची महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला दोन तासापर्यंत माहिती नव्हती. नागरिकांनी पुढाकार घेऊन तुटलेले गडर बाजूला काढून पुन्हा वहातूक सुरू केली.ठाणारोड,वाडारोड व कल्याणरोड या मार्गांना जोडणारा शहरातील राजीवगांधी स्मृती उड्डाणपुल दुरूस्तीसाठी पंधरा दिवस बंद होता.दुरूस्तीनंतर जड वहानांना पुलावरून जाण्यास पालिका प्रशासनाने बंदी केली होती. जड वहाने पुलावरून जाऊ नयेत म्हणून पुलाच्या दोन्ही टोकाला म्हणजेच बागेफिरदोस व रामेश्वर मंदिर या ठिकाणी लोखंडी गर्डर बसविण्यात आले होते. तसेच या प्रवेश बंदीचे बॅनर या गर्डरवर बसविण्यात आले होते. तरी देखील जड वहानांनी प्रवेश करू नये म्हणून त्या ठिकाणी पालिकेचे सुरक्षारक्षकांची ड्युटी लावलेली होती. असे असताना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान बागेफिरदोस येथे एका ट्रक चालकाने बँनरकडे दुर्लक्ष करीत पुलावरून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गर्डरला धक्का लागून लोखंडी गर्डर व त्यावरील बँनर तुटून ट्रकवर कोसळले. त्यामुळे पुन्हा राजीवगांधी उड्डाणपुलावर वहातूक कोंडी होऊन वहातूक बंद झाली. ही वहातूक बंद झाल्याने हलक्या वहानांतून जाणारे वाहनचालक,प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. ही घटना झाल्यानंतर तब्बल दोन तासांनी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान नागरिकांनी तुटलेले गडर बाजूला करून वहातूक पुर्ववत सुरू केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा बेशिस्त कारभाराबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असुन ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. मात्र पोलीसांनी ट्रक चालकाचे नाव सांगण्यास नकार दिला. मात्र यावेळी घटनास्थळी पालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कोठे होते? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात