शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

उल्हासनगरात रस्ता व नाल्याचे काम अर्धवट नाला ओलांडण्यासाठी विध्यार्थांची जीवघेणी कसरत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:05 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे.

उल्हासनगर - शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे.

उल्हासनगरात विविध विकासकामे अर्धवट असल्याचा फटका शहरवासियांना बसत आहे. वर्षानुवर्ष अर्धवट कामे ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी नोटीसा दिल्या जात आहे. महापालिकेच्या अश्या ढिसाळ कारभारावर सर्वस्तरातून टिका होत असून ठेकेदार महापालिकेला वरचड झाल्याची चर्चा सुरु झाली. कॅम्प नं-३, मयूर हॉटेल व आयटीआय, शासकीय तांत्रिक विद्यालय समोरील रस्त्याचे काम सुरु आहे. रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, मुलांना नाल्यावरील लोखंडी जलवाहिनीवरून भरपावसात जीवघेणा प्रवास करावा लागतो. या जलवाहिनीवरून जाताना मुलांचा पाय घसरला तर दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिका आयुक्तानी अश्या विकास कामावर लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराना नेहमी प्रमाणे नोटीसा न देता कारवाई करण्याची मागणी होत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्ता बांधणीसाठी ६८ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र काम गेल्या ३ वर्षापासून १० टक्केही झाले नाही. आजही काम ठप्प आहे. हीच परिस्थिती मुख्य ७ रस्त्याचे असून एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून या रस्त्याचे काम सुरु आहे. तर ४२६ कोटीच्या भुयाटी गटार योजने अंतर्गत शहरातील रस्ते गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदण्यात येत आहे. मात्र त्याची दूरस्ती तांत्रिक पद्धतीने झाली नसल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे. लहान-मोठे अपघात नेहमीचे झाले असून रस्त्यात वाहने फसण्याची व नागरिक पडून जखमी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे