शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

चिरव गावातील नदी पडली कोरडी; ग्रामस्थांसह जनावरे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:42 IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी घसरली असून, उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चिरव गावामधून बारमाही वाहणारी नदी कोरडी पडल्याने, परिसरातील रहिवाशांसह मुक्या जीवांचीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाºया चिरव येथील नदी कोरडी पडली असून नदीच्या पात्रात पाण्याऐवजी दगडधोंडेच दिसत आहेत. चिरव नदीला १२ महिने पाणी असते. या नदीच्या पाण्यावरच शेती व शेती दुय्यम पीक घेऊन ग्रामस्थ उदरनिर्वाह चालवतात. शेतीसाठी आणि पिण्यासाठी या नदीपात्रातून ग्रामस्थ पाणी वापरतात. परंतु, यावेळी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांसह जनावरांचीदेखील परवड होत आहे.

खराडे धरणाचे पाणी न सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. या नदीवर चांग्याचापाडा, अंबरपाडा, वेहळोली, चिरव, आष्टे, कानवे, चेरवली यासारख्या अनेक गावपाड्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.

वर्षभर वाहणारी चिरव नदी कोरडी पडली आहे. शेतकऱ्यांनी नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. धरणातून लवकरात लवकर नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. - संतोष चंदे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणी