शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

चिरव गावातील नदी पडली कोरडी; ग्रामस्थांसह जनावरे तहानलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:42 IST

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे.

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी घसरली असून, उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत, तसतशी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या चिरव गावामधून बारमाही वाहणारी नदी कोरडी पडल्याने, परिसरातील रहिवाशांसह मुक्या जीवांचीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.

मुंबई, ठाण्यासह उपनगरांना पाणीपुरवठा करणाºया शहापूर तालुक्यातील अडीचशे गावपाड्यांना पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच शहापूर तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाºया चिरव येथील नदी कोरडी पडली असून नदीच्या पात्रात पाण्याऐवजी दगडधोंडेच दिसत आहेत. चिरव नदीला १२ महिने पाणी असते. या नदीच्या पाण्यावरच शेती व शेती दुय्यम पीक घेऊन ग्रामस्थ उदरनिर्वाह चालवतात. शेतीसाठी आणि पिण्यासाठी या नदीपात्रातून ग्रामस्थ पाणी वापरतात. परंतु, यावेळी नदीचे पात्र पूर्णपणे कोरडेठाक पडल्याने ग्रामस्थांसह जनावरांचीदेखील परवड होत आहे.

खराडे धरणाचे पाणी न सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. या नदीवर चांग्याचापाडा, अंबरपाडा, वेहळोली, चिरव, आष्टे, कानवे, चेरवली यासारख्या अनेक गावपाड्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.

वर्षभर वाहणारी चिरव नदी कोरडी पडली आहे. शेतकऱ्यांनी नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा जाणवत आहे. धरणातून लवकरात लवकर नदीमध्ये पाणी सोडण्याची गरज आहे. - संतोष चंदे, शेतकरी

टॅग्स :Waterपाणी