शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

डहाणूत किनाऱ्याला रेती चोरीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:15 IST

संडे अँकर । प्रशासन अपयशी : किनाºयालगतची गावे नामशेष होण्याची पर्यावरणप्रेमींना भीती

डहाणू/बोर्डी : जागतिक तापमान वाढीमुळे मुंबईसह लगतची काही शहरे ३१ वर्षांनी पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त झाल्यानंतर याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र डहाणू तालुक्यातील समुद्रातून अवैध रेती चोरीने किनारा पुढे सरकत असून वृक्ष उन्मळणे, जमिनीची धूप, शेती आणि वस्त्यांमध्ये भरतीचे पाणी शिरून होणारा ºहास रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. दरम्यान, भरमसाठ रेती उपशामुळे होणाºया किनाºयालगत गावांचे नुकसान ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांआधी भोगावे लागत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीयस्तरावर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न चर्चेला आल्यानंतर मुंबई आणि परिसरातील समुद्रकिनाºयालगतच्या समस्यांविषयी मतमतांतरे व्यक्त होत आहेत. पण, मुंबईनजीकच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी ते बोर्डी या सुमारे ३३ कि.मी. लांबीच्या समुद्रात वाहने उतरवून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केली जाते. अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा तेजीत सुरू आहे. अती उपशामुळे किनारा उथळ बनला असून रेतीचे साठे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भरतीच्या लाटा थेट किनाºयावर धडकून मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याने धूप प्रतिबंधकाचे कार्य करणाºया सुरू बागांची एक रांग दरवर्षी उन्मळून जमीनदोस्त होत आहे. भरतीच्या पाण्याचा शिरकाव होऊन मर्यादावेल आणि अन्य गवत, औषधी वनस्पतींचा ºहास सुरू आहे. त्यामुळे किनाºयालगतच्या परिसंस्थेची मोठी हानी झाली आहे. येथे विणी हंगामात अंडी घालण्याकरिता येणाºया कासवांनी त्यामुळे कायमची पाठ फिरवली आहे. रेती वाहतुकीसाठी रात्री समुद्रात उतरणाºया वाहनांमुळे शांततेचा भंग होऊन विविध प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचला असून त्यांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.प्रतिवर्षी समुद्राच्या भरती रेषेत होणारी वाढ भितीदायक असून डहाणू - बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर भरतीचे पाणी पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर किनाºयालगतच्या जमिनीवर भराव घालून त्यावर उभ्या बांधकामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती येते तर कोलंबी प्रकल्पाच्या नावाखाली कांदळवन आणि खाजण क्षेत्राला धक्का पोहचून तटीय क्षेत्रातील शेतीत उधाणाच्या पाण्याचा शिरकाव होऊन नापिकता आणि वस्तीत पाणी शिरून घरांच्या नुकसानीच्या घटना वाढल्या आहेत.रेती चोरी थांबविण्याकरिता अर्ज, निवेदन, तक्र ारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून भूमिपुत्र विरोध दर्शवीत आहेत. परंतु यातून मोठा आर्थिक फायदा मिळत असल्याने गावोगावी रेती माफिया दिसतात. त्यांचा प्रभाव वाढत असून त्याला होणारा विरोध संपविण्याचे संघटित कार्य हाती घेतले जाते. महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे बंड मोडण्याचे प्रयत्न होतात. बंद पत्र प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी, फौजदारी गुन्हा, या गुन्ह्यात सापडलेले वाहन कायमचे जप्त व परवाना रद्द करणे आणि मोक्कासारख्या मोठ्या शिक्षेची तरतूद यासाठी करावी. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा रेती चोरीमुळे किनाºयालगतची गावे नामशेष होण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.गावोगावी रेतीमाफियारेती चोरी थांबविण्याकरिता तक्र ारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून भूमिपुत्र विरोध दर्शवित आहेत. परंतु यातून मोठा आर्थिक फायदा मिळत असल्याने गावोगावी रेती माफिया दिसतात. त्यांचा प्रभाव वाढत असून त्याला होणारा विरोध संपविण्याचे संघटित कार्य हाती घेतले जाते. महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून हे बंड मोडण्याचे प्रयत्न होतात. बंद पत्र प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी, फौजदारी गुन्हा, या गुन्ह्यात सापडलेले वाहन कायमचे जप्त व परवाना रद्द करणे आणि मोक्कासारख्या मोठ्या शिक्षेची तरतूद यासाठी करावी. अन्यथा रेती चोरीमुळे गावे नामशेष होतील.

टॅग्स :sandवाळूthaneठाणे