शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

सेंट्रल मैदानावरून शिवसेना-राष्ट्रवादीत दंगल

By admin | Updated: January 14, 2017 06:21 IST

ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्षांची मेळावा आणि बैठकांसाठी जागा मिळवण्याची चढाओढ सुरु झाली आहे.

अजित मांडके / ठाणे ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्व पक्षांची मेळावा आणि बैठकांसाठी जागा मिळवण्याची चढाओढ सुरु झाली आहे. पक्षाचे मेळावे-सभा शिवसेना आणि राष्ट्रवादीने ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या सेंट्रल मैदानात घेण्याचे ठरविले आहे. दोन्ही पक्षांनी १८ फेब्रुवारीसाठी हेच मैदान मागितले आहे. परंतु हे मैदान केवळ क्रीडा प्रकारांसाठीच देण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे सेंट्रल मैदानाच्या कमिटीने स्पष्ट केल्याने त्याची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शहरात अन्य कोणत्या मैदानावर अशा प्रकारे मेळावा घेता येऊ शकतो, याची चाचपणी सुरु झाली आहे. त्याचवेळी उच्च न्यायालयातून विशेष बाब म्हणून जो आधी परवानगी आणेल, त्याला कदाचित हे मैदान उपलब्ध होऊ शकते, अशीही शक्यता आहे. २१ फेब्रुवारला ठाणे महापालिकेचा रणसंग्राम रंगेल. या निवडणुकीत खरी लढत ही शिवसेना-भाजपामध्ये होणार असली तरी राष्ट्रवादीचीही ताकद मोठी आहे. एकूणच आपल्या पक्षप्रमुखांच्या सभा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांनी ठाण्यातील सेंट्रल मैदान मिळावे म्हणून मैदान कमिटीकडे पत्र पाठविले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनीही निवडणुकीचा प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशीच्या तारखेचाच हट्ट धरला आहे. शिवसेनेने १७, १८ आणि १९ फेब्रुवारी या तारखा जरी दिल्या असल्या तरी त्यांनाही १८ तारखीच हवी असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. परंतु त्याच दिवशी राष्ट्रवादीने देखील हट्ट धरला होता. मात्र हे मैदान उपलब्ध होणार नसल्याचे पत्र सेंट्रल मैदान कमिटीने पाठवले आहे. हे मैदान क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांसाठी उपलब्ध होत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन एका दक्ष नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे मैदान यापुढे केवळ खेळांसाठीच उपलब्ध असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्याचाच आधार सेंट्रल मैदान व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे आता सभा घ्यायची कुठे असा पेच सध्या या दोन्ही पक्षांपुढे आहे. यापूर्वी शिवसेनेची सर्वात पहिली सभा नौपाड्यातील गावदेवी मैदानात झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते मैदान गाजवले होते. आता हे मैदान सभेसाठी पुरेसे नसल्याचे कारण पुढे येऊ लागले आहे. तसेच तेथील दक्ष नागरिकांनीही अशा सभांना आक्षेप घेतल्याने हा भाग शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. शिवाजी मैदानही अपुरेच असून तेथे जास्तीत जास्त ३०० लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे तेथेही सभा घेणे अशक्यच आहे. दादोजी कोंडदेव क्रीडागृहही क्रीडाप्रकारांसाठीच उपलब्ध असेल, असे यापूर्वीच पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. ढोकाळी भागातील हायलॅण्ड येथील मैदान हे आडबाजूला असल्याने त्या मैदानाचा आता विचार सुरु असला, तरी देखील ते राष्ट्रवादीवगळता इतर पक्षांना फारसे सोईचे ठरणार नाही.