शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

केळकर रोडवर पुन्हा अवतरला रिक्षा स्टँड!

By admin | Updated: June 23, 2017 05:51 IST

सतत होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषणामुळे केळकर रोडवरील बेकायदा रिक्षा स्टँड बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने देऊन काही

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : सतत होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषणामुळे केळकर रोडवरील बेकायदा रिक्षा स्टँड बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने देऊन काही तास उलटतात न उलटतात तोच रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी एकत्र येत तो स्टँड त्याच जागी पुन्हा सुरू केला. या रस्त्यावर प्रवासी उतरवण्याची व्यवस्था आणि स्टँड दोन्ही असल्याने तेथे दिवसभर वाहतूक कोंडी होते आणि आवाज, हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे व्यापारी, रहिवाशांचाही या स्टँडला विरोध होता, पण तोही डावलण्यात आला.स्टेशन परिसरातील राथ रोड, उर्सेकरवाडी, साठ्ये मार्ग यावर वाहतूक न वळवता ती फक्त केळकर रोडवर आणण्यास रहिवाशांचा विरोध आहे. स्टेशन परिसरात प्रामुख्याने केळकर रोड, इंदिरा गांधी चौकात वाहतूक कोंडी होते. त्याला तेथील मुबलक रिक्षा स्टँड आणि प्रवासी उतरवणे कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी या भागातील बेकायदा रिक्षा स्टँड हटवण्याची त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवली होती. त्यावर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा स्टँड बेकायदा असल्याचे स्पष्टही केले होते. त्यांच्या त्या कारवाईला जशास जसे उत्तर देत रिक्षा संघटनांनी पुन्हा तो त्याच जागी सुरू केला. ‘आमचा स्टँड येथे होताच; पण केवळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वाहतूक विभागाच्या विनंतीमुळे आम्ही काहीकाळ पाटकर रोडवर गेलो होतो. आता केळकर रोडच्या अर्ध्या भागातील काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. पालिकेने रस्ता सुरु केला आहे. आता आम्ही पुन्हा पूर्वीच्या स्टँडच्या ठिकाणी आलो आहोत. आम्हाला येथून हटवून हजारो प्रवाशांची गैरसोय करू नये,’ असे सांगत शहरातील रिक्षा चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दत्ता माळेकर, काळू कोमास्कर, शेखर जोशी, संजय देसले, तात्या माने, संजय मांजरेकर, रामा काकडे यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रिक्षा ही आमची रोजीरोटी आहे. ज्यांना या स्टँडचे, या विषयाचे राजकारण करायचे आहे, त्यांना खाण्या-पिण्याची भ्रांत नाही. राजकारण करायला शहरात भरपूर विषय आहेत, असा टोला त्यांनी लगावला. केळकर रोडचा रिक्षा स्टँड हा आरटीओच्या मंजुरीने सुरू झालेला आहे. अनेक वर्षांपासून तो तेथे आहे. त्यात कोणीही ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. त्या स्टँडचा शुभारंभ झाल्यावर सर्व पदाधिकारी वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र नेवाळी दुर्घटनेमुळे गंभीरे बंदोबस्तात व्यस्त असल्याने ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांनी स्टँड केळकर रोडवर पूर्ववत सुरू केल्याची कल्पना त्यांना फोनवरून दिली.