शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

‘पासिंग’साठी रिक्षाचालकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:36 IST

५० दिवसांनी मिळतेय तारीख : मनुष्यबळाअभावी कामकाज धीम्यागतीने

कल्याण : रिक्षांची संख्या भरमसाट वाढत असताना ‘आरटीओ’कडून रिक्षांचे पासिंग वेळेत होत नसल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीस आले आहेत. आरटीओकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पासिंगसाठी तब्बल ५० दिवसांचा विलंब लागत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लवकर नंबर लागत नसल्याने ‘पासिंग’विनाच रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. फिटनेसअभावी रिक्षाला एखादा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. आरटीओने मनुष्यबळ वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांचा अंतर्भाव होतो. परिक्षेत्रात नऊ लाखांच्या आसपास वाहने आहेत. यात रिक्षांची संख्या ५० ते ५५ हजारांच्या आसपास आहे. दरम्यान, ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. एकीकडे रोजगाराच्या उद्देशाने सरकारकडून रिक्षा परवान्यांचे वाटप सुरू असले, तरी यामध्ये रिक्षा व्यवसायातील स्पर्धा वाढल्याने उपासमारीचे संकट रिक्षाचालकांवर आले आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांतर्फे परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पण, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने दिवसागणिक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. दरम्यान, रिक्षांचा लोंढा वाढत असताना रिक्षांच्या पासिंगसाठी आरटीओकडे नंबर लागणेही मुश्कील बनले आहे.

याआधी सात ते आठ दिवसांत नंबर लागायचा, पण सध्या तब्बल ५० दिवसांनी पासिंगची तारीख मिळत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. दर दोन वर्षांनी रिक्षांचे पासिंग करणे बंधनकारक आहे. यात तपासणी होऊन रिक्षा चालवण्यायोग्य आहे की नाही, याबाबत आरटीओकडून प्रमाणपत्र दिले जाते. कल्याण आरटीओकडून दिवसभरात ८० रिक्षांचीच तपासणी केली जात आहे. पासिंगसाठी विलंब लागत असल्याने नंबर वेळेवर लागावा म्हणून पहाटेपासूनच आरटीओकडून होणाºया तपासणीसाठी रांगा लावायला लागत असल्याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे. कल्याण पूर्वेकडील मलंगरोडवरील नांदिवली परिसरात आरटीओकडून पासिंगसाठी येणाºया वाहनांची तपासणी केली जाते. तपासणीसाठी ट्रॅक उभारण्यात आला आहे. पण, त्याठिकाणी प्रसाधनगृहाची तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने पहाटेपासून रांगा लावणाºया रिक्षाचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपुरे मनुष्यबळ आहेच, शिवाय आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. याचा फटकाही रिक्षासह अन्य वाहनांच्या पासिंगलाही बसत आहे.