शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

‘पासिंग’साठी रिक्षाचालकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:36 IST

५० दिवसांनी मिळतेय तारीख : मनुष्यबळाअभावी कामकाज धीम्यागतीने

कल्याण : रिक्षांची संख्या भरमसाट वाढत असताना ‘आरटीओ’कडून रिक्षांचे पासिंग वेळेत होत नसल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीस आले आहेत. आरटीओकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पासिंगसाठी तब्बल ५० दिवसांचा विलंब लागत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लवकर नंबर लागत नसल्याने ‘पासिंग’विनाच रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. फिटनेसअभावी रिक्षाला एखादा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. आरटीओने मनुष्यबळ वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांचा अंतर्भाव होतो. परिक्षेत्रात नऊ लाखांच्या आसपास वाहने आहेत. यात रिक्षांची संख्या ५० ते ५५ हजारांच्या आसपास आहे. दरम्यान, ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. एकीकडे रोजगाराच्या उद्देशाने सरकारकडून रिक्षा परवान्यांचे वाटप सुरू असले, तरी यामध्ये रिक्षा व्यवसायातील स्पर्धा वाढल्याने उपासमारीचे संकट रिक्षाचालकांवर आले आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांतर्फे परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पण, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने दिवसागणिक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. दरम्यान, रिक्षांचा लोंढा वाढत असताना रिक्षांच्या पासिंगसाठी आरटीओकडे नंबर लागणेही मुश्कील बनले आहे.

याआधी सात ते आठ दिवसांत नंबर लागायचा, पण सध्या तब्बल ५० दिवसांनी पासिंगची तारीख मिळत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. दर दोन वर्षांनी रिक्षांचे पासिंग करणे बंधनकारक आहे. यात तपासणी होऊन रिक्षा चालवण्यायोग्य आहे की नाही, याबाबत आरटीओकडून प्रमाणपत्र दिले जाते. कल्याण आरटीओकडून दिवसभरात ८० रिक्षांचीच तपासणी केली जात आहे. पासिंगसाठी विलंब लागत असल्याने नंबर वेळेवर लागावा म्हणून पहाटेपासूनच आरटीओकडून होणाºया तपासणीसाठी रांगा लावायला लागत असल्याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे. कल्याण पूर्वेकडील मलंगरोडवरील नांदिवली परिसरात आरटीओकडून पासिंगसाठी येणाºया वाहनांची तपासणी केली जाते. तपासणीसाठी ट्रॅक उभारण्यात आला आहे. पण, त्याठिकाणी प्रसाधनगृहाची तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने पहाटेपासून रांगा लावणाºया रिक्षाचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपुरे मनुष्यबळ आहेच, शिवाय आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. याचा फटकाही रिक्षासह अन्य वाहनांच्या पासिंगलाही बसत आहे.