शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

‘पासिंग’साठी रिक्षाचालकांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:36 IST

५० दिवसांनी मिळतेय तारीख : मनुष्यबळाअभावी कामकाज धीम्यागतीने

कल्याण : रिक्षांची संख्या भरमसाट वाढत असताना ‘आरटीओ’कडून रिक्षांचे पासिंग वेळेत होत नसल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीस आले आहेत. आरटीओकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पासिंगसाठी तब्बल ५० दिवसांचा विलंब लागत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लवकर नंबर लागत नसल्याने ‘पासिंग’विनाच रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. फिटनेसअभावी रिक्षाला एखादा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. आरटीओने मनुष्यबळ वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांचा अंतर्भाव होतो. परिक्षेत्रात नऊ लाखांच्या आसपास वाहने आहेत. यात रिक्षांची संख्या ५० ते ५५ हजारांच्या आसपास आहे. दरम्यान, ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. एकीकडे रोजगाराच्या उद्देशाने सरकारकडून रिक्षा परवान्यांचे वाटप सुरू असले, तरी यामध्ये रिक्षा व्यवसायातील स्पर्धा वाढल्याने उपासमारीचे संकट रिक्षाचालकांवर आले आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांतर्फे परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पण, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने दिवसागणिक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. दरम्यान, रिक्षांचा लोंढा वाढत असताना रिक्षांच्या पासिंगसाठी आरटीओकडे नंबर लागणेही मुश्कील बनले आहे.

याआधी सात ते आठ दिवसांत नंबर लागायचा, पण सध्या तब्बल ५० दिवसांनी पासिंगची तारीख मिळत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. दर दोन वर्षांनी रिक्षांचे पासिंग करणे बंधनकारक आहे. यात तपासणी होऊन रिक्षा चालवण्यायोग्य आहे की नाही, याबाबत आरटीओकडून प्रमाणपत्र दिले जाते. कल्याण आरटीओकडून दिवसभरात ८० रिक्षांचीच तपासणी केली जात आहे. पासिंगसाठी विलंब लागत असल्याने नंबर वेळेवर लागावा म्हणून पहाटेपासूनच आरटीओकडून होणाºया तपासणीसाठी रांगा लावायला लागत असल्याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे. कल्याण पूर्वेकडील मलंगरोडवरील नांदिवली परिसरात आरटीओकडून पासिंगसाठी येणाºया वाहनांची तपासणी केली जाते. तपासणीसाठी ट्रॅक उभारण्यात आला आहे. पण, त्याठिकाणी प्रसाधनगृहाची तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने पहाटेपासून रांगा लावणाºया रिक्षाचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपुरे मनुष्यबळ आहेच, शिवाय आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. याचा फटकाही रिक्षासह अन्य वाहनांच्या पासिंगलाही बसत आहे.