शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:31 AM

एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.

- प्रशांत मानेडोंबिवली : एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसत असलेतरी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा याकडे होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. परवाना नसताना बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या या मुलांच्या टवाळखोरीमुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नवीन परवाना वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. परंतु, सरकारने परवाना देणे सुरूच ठेवल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घेऊनही दुसरा व्यवसाय करणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती रिक्षा जात असल्याचे बोलले जात आहे.परवानाधारक रिक्षाचालकाकडे परवाना आणि बॅज बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षामालक ते नसलेल्या चालकांच्या हाती रिक्षा देत आहेत. त्यामुळे १५ ते १६ वर्षांची मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतो. ते बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, गुटखा, मावा खाणे, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडे ते आकारत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात आहे. तसेच रिक्षाव्यवसायही एकप्रकारे बदनाम होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक झाला आहे. २८ जूनला अशा टवाळखोर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशाचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली होती. त्यात प्रवाशीही जखमी झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदही आहे. पण याउपरही अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.>तक्रार करूनही कानाडोळाबेकायदा रिक्षा व्यवसाय करणाºयांविरोधात आरटीओ आणि वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. अशा टवाळखोरांमुळे रिक्षा व्यवसायही बदनाम झाला आहे.रिक्षांची वाढती संख्या पाहता नवीन परवाना देणे थांबवा, अशीही मागणी केली आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे मत कोकण रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.>कारवाई सुरू असल्याचा दावा : यासंदर्भात आमची कारवाई सुरू असते. मी स्वत: नुकताच दौरा करून, अशा रिक्षाचालकांवर केस दाखल केल्या आहेत. यामध्ये परवानाधारकाला एक महिन्याची निलंबन कारवाईपण आहे. याउपरही हे प्रकार सुरू असतील तर कारवाई तीव्र करावी लागेल, अशी प्रतिक्रिया आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.