शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:31 IST

एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.

- प्रशांत मानेडोंबिवली : एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसत असलेतरी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा याकडे होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. परवाना नसताना बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या या मुलांच्या टवाळखोरीमुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नवीन परवाना वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. परंतु, सरकारने परवाना देणे सुरूच ठेवल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घेऊनही दुसरा व्यवसाय करणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती रिक्षा जात असल्याचे बोलले जात आहे.परवानाधारक रिक्षाचालकाकडे परवाना आणि बॅज बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षामालक ते नसलेल्या चालकांच्या हाती रिक्षा देत आहेत. त्यामुळे १५ ते १६ वर्षांची मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतो. ते बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, गुटखा, मावा खाणे, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडे ते आकारत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात आहे. तसेच रिक्षाव्यवसायही एकप्रकारे बदनाम होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक झाला आहे. २८ जूनला अशा टवाळखोर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशाचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली होती. त्यात प्रवाशीही जखमी झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदही आहे. पण याउपरही अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.>तक्रार करूनही कानाडोळाबेकायदा रिक्षा व्यवसाय करणाºयांविरोधात आरटीओ आणि वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. अशा टवाळखोरांमुळे रिक्षा व्यवसायही बदनाम झाला आहे.रिक्षांची वाढती संख्या पाहता नवीन परवाना देणे थांबवा, अशीही मागणी केली आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे मत कोकण रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.>कारवाई सुरू असल्याचा दावा : यासंदर्भात आमची कारवाई सुरू असते. मी स्वत: नुकताच दौरा करून, अशा रिक्षाचालकांवर केस दाखल केल्या आहेत. यामध्ये परवानाधारकाला एक महिन्याची निलंबन कारवाईपण आहे. याउपरही हे प्रकार सुरू असतील तर कारवाई तीव्र करावी लागेल, अशी प्रतिक्रिया आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.