शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

रिक्षाचालकांचे मीटर बंद; डोंबिवलीमध्ये लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:24 IST

चालकांची मनमानी; ‘पाम’चे आरटीओ, वाहतूक नियंत्रण विभागाला पत्र

डोंबिवली : शहरातील अंतर्गत वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या रिक्षावाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. नियमानुसार रिक्षा या मीटरप्रमाणेच धावायला हव्यात; मात्र सध्या मीटर रिक्षाच कुठे गायब झाल्या की काय, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढली असून ‘मागू ते भाडे’ अशी एकंदर परिस्थिती आहे. आरटीओ, वाहतूक पोलिसांचा अंकुश नसल्याने बिनबोभाट ही लूट सुरू आहे. याबाबत ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला’ (पाम) या संस्थेने आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण विभागाला पत्र लिहून या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.बेशिस्त रिक्षाचालकांमुळे शहरात वाहतूककोंडी गंभीर बनली आहे. एखाद्या प्रवाशाला मीटरनुसार प्रवास करायचा असेल, तर रिक्षा सापडणे मुश्कील होते. पाटकर रस्त्यावर काही वर्षांपूर्वी मीटर रिक्षांसाठी स्वतंत्र स्टॅण्ड होता; मात्र रस्त्याच्या कामावेळी काढलेले स्टॅण्ड बंदच आहे. त्यामुळे शहरात बहुतांश ठिकाणी मीटर रिक्षा धावतच नसल्याचे चित्र दिसत आहे. ‘पाम’ या संस्थेने या मनमानीविरोधात आक्षेप घेत मीटरसक्ती करण्यासह स्वतंत्र रिक्षास्टॅण्ड असावे, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबरच इतर २५ अपेक्षांचे पत्र आरटीओ, वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.प्रवाशांकडून मनमानी भाडेवसुली, रिक्षास्टॅण्डजवळ वाहतूक पोलीस नसणे, प्रवासी-रिक्षाचालकांमधील वाद, बसथांब्यावर रिक्षा-टॅक्सी उभ्या करणे, बस आल्यानंतर रिक्षा, टॅक्सी बाजूला न घेणे आदी तक्रारी करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्यास प्रवाशांना सहकार्य केले जात नाही. तसेच वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवल्यास बघू, करू अशी उत्तरे प्रवाशांना मिळत असल्याचे ‘पाम’ने म्हटले आहे. प्रवाशांना भेडसावणाºया समस्या आरटीओ, वाहतूक पोलिसांना का दिसत नाहीत, अशी विचारणाही या पत्रात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे. रिक्षाचालकांचा मनमानी कारभार थांबवा आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, असे चर्चेच्या वेळी संस्थेचे प्रमोद काणे, निखिल माने, प्रसाद आपटे आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले.प्रवाशांच्या समस्या सोडवण्यावर भरकमी मनुष्यबळाचे वाहतूक पोलिसांसमोर आव्हान आहे. तरीही, प्रवाशांच्या समस्या दूर करण्यावर कायम भर असतो, असे वाहतूक पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी सांगितले. प्रवाशांनी सामंजस्य दाखवावे. तसेच काही अडचण आल्यास वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. तसेच गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसांना कोंडी कमी करण्यासाठी, वाहने सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा