शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

रिक्षाचालक बेकायदा भाडेवाढीच्या पवित्र्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 05:31 IST

वाढत्या महागाईमुळे हतबल : ‘कोकण रिक्षा-टॅक्सी’चाही सरकारला इशारा

प्रशांत मानेकल्याण : वाढती महागाई व अनेक कारणांमुळे रिक्षा व्यवसाय डबघाईला आल्याने ‘सांगा जगायचे कसे?’, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. प्रलंबित भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, असे पत्र कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने आॅगस्टमध्ये परिवहन विभागाला पाठवले होते. परंतु, आजतागायत कोणताही निर्णय झालेला नाही. लवकर निर्णय घ्या, अन्यथा नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागेल, असा पवित्रा रिक्षाचालकांनी घेतला आहे. रिक्षाचालकांच्या या भूमिकेला पाठिंबा असेल, असे महासंघाने स्पष्ट केल्याने लवकरच बेकायदा भाडेवाढीला प्रवाशांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये भाडे आकारले जात आहे. ते २२ रुपये करावे आणि पुढील किलोमीटरसाठी १२ रुपयांवरून १६ रुपये दरवाढ मिळावी, अशी मागणी रिक्षाचालकांची आहे. परंतु, चार वर्षे कोणतीही भाडेवाढ झालेली नाही. रिक्षा विमा, एकरकमी कर, विविध परिवहन शुल्क यामध्ये भरमसाट वाढ झाली आहे. परिणामी, दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र (पासिंग) खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वारंवार वाढणाऱ्या किमती, दैनंदिन उदरनिर्वाह गरजा, मुलाबाळांचा शैक्षणिक खर्च, आजारपण, आरोग्यविषयक खर्च हा सर्व आॅटोरिक्षाचालकांना दैनंदिन मिळणाºया उत्पन्नातूनच भागवावा लागत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.कोकण रिजनमधील रिक्षाचालकांनी १२ जुलैला कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयावर निदर्शने केली होती. या आंदोलनाला एक महिना उलटत नाही, तोच पुन्हा रिक्षा-टॅक्सी महासंघानेच पत्रप्रपंचही केला होता.महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी योग्य ती भाडेवाढ दिली पाहिजे. परंतु, सीएनजी गॅसदरात पाच रुपये प्रतिकिलो वाढ होऊनही चार वर्षे रिक्षाभाडेवाढ परिवहन विभागाने केलेली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु, त्याकडे आजमितीला पुरते दुर्लक्ष झाले आहे.आमच्यावर आली बेरोजगारीची संक्रांत

च्आधीच महागाईने व्यवसाय करणे जिकिरीचे बनले आहे. त्यात सरकारने रिक्षा परवाने खुले केल्याने रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होत आहे.च्परवाने देण्याच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे, ही सरकारची भूमिका असली तरी दुसरीकडे यामुळे रिक्षा वाढल्याने स्पर्धा होऊन बेरोजगारीची संक्रांत आमच्यावर आल्याचे मत कल्याणमधील रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी व्यक्त केले.रिक्षाचालकांच्या भावना लक्षात घ्यामागील चार वर्षे भाडेवाढ नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयावर निदर्शने आणि परिवहन विभागाला पत्र देऊनही भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागेल, हा रिक्षाचालकांनी घेतलेला पवित्रा योग्यच आहे.सरकारने वेळीच भाडेवाढ करावी, अन्यथा आम्हाला ती करावी लागेल, असे मत कोकण रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेauto rickshawऑटो रिक्षा