शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउननंतर रिक्षाभाडेवाढ अटळ; प्रवाशांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 01:07 IST

फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा

- प्रशांत माने कल्याण : लॉकडाउनमुळे दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच लॉकडाउननंतर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवरही मर्यादा येणार आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी रिक्षाचालकांकडून भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, आरटीओकडून भाडेवाढीला मान्यता मिळण्यापूर्वीच छुप्या भाडेवाढीचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागणार आहे.

कोरोनामुळे १८ मार्चपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे जगणे कठीण झाल्याने रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. मात्र, ती मंजूर झाली नाही. उपासमारीची वेळ आल्याने मुंबई आणि ठाण्यातून सुमारे २५० ते ३०० रिक्षाचालकांनी रिक्षासह गावची वाट धरली आहे. दरम्यान, परराज्यात गेलेल्या रिक्षाचालकांची अधिकृत नोंदही रिक्षासंघटनांकडे नाही.

कल्याण-डोंबिवलीत २८ हजार रिक्षा असून, त्यातील ९० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने चालतात. काही रिक्षाचालक गावी गेल्याने ऐन पावसाळ्यात रिक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जूनमध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यास काही अटीशर्थींचे पालन करूनच रिक्षाचालकांना व्यवसायास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. शेअर रिक्षात दोघांनाच प्रवासाची मुभा असेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेअर रिक्षाचालक तिसºया व चौथ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअरचे भाडे २० ते २५ टक्क्यांनी वाढले, अशी सूत्रांची माहिती आहे.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रिक्षा प्रवास सुरू करायचा की नाही, त्याबाबत एमएमआरटीए जो निर्णय देईल, त्याप्रमाणे नियोजन केले जाईल. भाडेवाढीचा निर्णय हा धोरणात्मक आहे. राज्य सरकारकडून ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल.- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालविण्यास परवानगी मिळाली तर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा येणार आहेत. रिक्षाचालकाचे नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे हे अटळ आहे. आरटीओकडून जे भाडे ठरविले जाईल, ते स्वीकारण्याची आमची तयारी आहे. लॉकडाउनमुळे प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी दरवाढीचे फलक लावले जातील.- प्रकाश पेणकर,अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सी महासंघ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण