शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

रिक्षाचालकांचे महिलांसोबत उद्धट वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:55 IST

डोंबिवली स्टेशन परिसर : भाडे नाकारून दिली बघून घेण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांत महिला पत्रकारांनाही रिक्षाचालकांच्या उद्धट वर्तनाचा अनुभव आला. भाडे नाकारले म्हणून जाब विचारल्याने तुम्हाला बघून घेईन, अशी धमकीच दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत या महिला पत्रकारांनी वाहतूक शाखेत तक्रार दिली आहे. यावरून सर्वसामान्य प्रवाशांना कशी वागणूक मिळत असेल, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.डोंबिवली रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यानंतर पूर्व आणि पश्चिमेला रिक्षाचालकांनी प्रवाशांची वाट अडवून ठेवली आहे. मधल्या पुलावरून उतरल्यावर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंना रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्री प्रवास करणाऱ्यांना तर खूपच वाईट अनुभव असून भाड्यावरून वाद घातला जातो. डोंबिवली पूर्वेतील गावदेवी मंदिर, गोग्रासवाडी, मानपाडा रोड तर डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर सारख्या जवळच्या परिसरात येण्यासाठी हे रिक्षाचालक हमखास भाडे नाकारतात.एका महिला पत्रकाराने सोमवारी डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकातून घरडा सर्कलकडे जाण्यासाठी रिक्षाचालकाला सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने हे भाडे नाकारले. त्यावर थेट आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे तक्रार करते, असे सांगूनही रिक्षाचालकाने दाद दिली नाही, असे तिने सांगितले. दोन दिवसांपूर्वी आणखी एका पत्रकारालाही असाच अनुभव आला. तिने गोविंदनगरमध्ये नेण्यासाठी रिक्षाचालकाला सांगितले असता त्याने नकार दिला. त्यावर जाब विचारताच अरेरावीच्या भाषेत बोलून तुम्हाला बघून घेईन, अशी धमकीच दिली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरटीओने तक्रार क्रमांक दिलेला आहे; मात्र तो लागतच नाही. कार्यालयात जाऊन तक्रार करायची म्हटल्याचे कार्यालय कल्याणमध्ये आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांनी तक्रार कुठे करायची, अशी प्रतिक्रिया प्रवासी सोनल सावंत यांनी दिली.वाहन क्रमांकासह तक्रार दिल्यास कारवाई करू!उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय ससाणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वाहनक्रमांकासह तक्रार प्राप्त झाल्यास चालकांचे लायसन्स आणि परवानाधारकांचा परवाना यावर विभागीय कारवाई करता येईल. या सगळ््यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील वाहतूक निरीक्षक सतेज जाधव यांना विचारले असता वाहतूककोंडी सोडवण्याचे काम आमचे असून रिक्षेचा नंबर, रिक्षाचालकांचा परवाना देणे हे काम आरटीओ विभागाचे आहे, असे सांगितले.