शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रिक्षाचालक मटका, लॉटरीच्या नादी; होताहेत कर्जबाजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:28 IST

रिक्षा चालक मालक युनियनचा आंदोलनाचा पवित्रा, विष्णूनगर पोलिसांना दिले पत्र

डोंबिवली : येथील पश्चिमेकडे रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पोलिस ठाण्याचे स्थलांतर आनंद नगर येथे झाले. तेव्हापासून या परिसरात अवैध मटका, लॉटरी व्यवसायाचे पेव फुटले असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा चालक मालक युनियनने विष्णूनगर पोलिसांना केली आहे.

त्यासंदर्भात या युनयिनचे उपाध्यक्ष शेखर जोशी म्हणाले की, रेल्वे स्थानक परिसर, आणि रिक्षा स्टँड जवळ असलेल्या या अवैध व्यवसायांमुळे अनेक रिक्षाचालकांचे कुटूंब उध्वस्त झाले आहेत. काही वेळेस रिक्षा चालक लॉटरी लागेल या आमिषापोटी व्याजाने उसने पैसे घेत असल्यामुळेही त्यांच्यावर कर्जाचे डोंगर उभे राहीले आहेत. हे सर्व प्रकार तातडीने थांबावेत यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी उपरोक्त युनियनेने पत्राद्वारे केली आहे.

त्यासंदर्भात युनियनच्या माध्यमातून नागरिक, रिक्षा चालकांच्या सह्या घेण्यात आल्या असून जनजागृतीही करण्यात आली आहे, पण वैयक्तिक लाभापुढे जनजागृती कमी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस ठाणे स्थलांतरीत झाल्याने असा व्यवसाय करणाऱ्यांवर कोणाचाही धाक राहीला नाही. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच यात लक्ष घालावे, अशा अनैतिक धंद्यांना आळा घालावा, आणि भविष्यात निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

पत्राद्वारे पोलिस यंत्रणेने कारवाई न केल्यास रिक्षा युनियनच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबियांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही युनयिनचे सरचिटणीस भिकाजी झाडे, उपाध्यक्ष विश्वंभर दुबे, कार्यालय प्रमुख कैलास यादव आदींनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा