शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

नेवाळी येथील जमीन शेतकऱ्यांना परत करा, श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 17:13 IST

 कल्याणजवळील नेवाळी येथील शेतकरी गेली सात दशके आपली जमीन केंद्र सरकारकडून परत मिळवण्यासाठी झगडत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कारावास भोगावा लागत आहे, अशा शब्दांत नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा बुधवारी लोकसभेत मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन परत करावी अथवा आजच्या भावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

ठळक मुद्देनेवाळी येथील जमीन शेतकऱ्यांना परत कराखासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणीशेतकऱ्यांना दोन-तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागला

ठाणे : कल्याणजवळील नेवाळी येथील शेतकरी गेली सात दशके आपली जमीन केंद्र सरकारकडून परत मिळवण्यासाठी झगडत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कारावास भोगावा लागत आहे, अशा शब्दांत नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा बुधवारी लोकसभेत मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन परत करावी अथवा आजच्या भावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी केली. ज्यांची जमीन अथवा मालमत्ता अधिग्रहीत केली जात आहे, अशा व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने रिक्विझिशन अँड अॅक्विझिशन कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत मांडले असून बुधवारी त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना खा. डॉ. शिंदे यांनी नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची समस्या मांडली. खा. डॉ. शिंदे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान तत्कालीन ब्रिटिश सरकारने नेवाळी येथील १६०० एकर जागा ताब्यात घेतली, त्यावेळच्या आदेशात युद्ध समाप्तीनंतर सहा महिन्यांत जमीन परत करण्यात येईल, असे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, आज सात दशकांनंतरही शेतकऱ्यांना जमीन मिळालेली नाही. सरकार नुकसान भरपाई दिल्याचा दावा करते, मात्र संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नाहीत. जून महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी शेतकऱ्यांना दोन-तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागला. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची भाषा सरकार करत असताना शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी तुरुंगात जावं लागत असेल, तर ते दुर्दैवी आहे, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत करावी किंवा सध्याच्या कायद्यानुसार आजच्या बाजारभावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. तसेच, मध्यममार्ग म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात राज्य शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध करून द्यावी, असा तोडगाही खा. डॉ. शिंदे यांनी मांडला. या कायद्यातील सुधारणेमुळे या शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणे