शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी येथील जमीन शेतकऱ्यांना परत करा, श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 17:13 IST

 कल्याणजवळील नेवाळी येथील शेतकरी गेली सात दशके आपली जमीन केंद्र सरकारकडून परत मिळवण्यासाठी झगडत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कारावास भोगावा लागत आहे, अशा शब्दांत नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा बुधवारी लोकसभेत मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन परत करावी अथवा आजच्या भावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी केली.

ठळक मुद्देनेवाळी येथील जमीन शेतकऱ्यांना परत कराखासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणीशेतकऱ्यांना दोन-तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागला

ठाणे : कल्याणजवळील नेवाळी येथील शेतकरी गेली सात दशके आपली जमीन केंद्र सरकारकडून परत मिळवण्यासाठी झगडत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कारावास भोगावा लागत आहे, अशा शब्दांत नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा बुधवारी लोकसभेत मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन परत करावी अथवा आजच्या भावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी केली. ज्यांची जमीन अथवा मालमत्ता अधिग्रहीत केली जात आहे, अशा व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने रिक्विझिशन अँड अॅक्विझिशन कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत मांडले असून बुधवारी त्यावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना खा. डॉ. शिंदे यांनी नेवाळी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची समस्या मांडली. खा. डॉ. शिंदे म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान तत्कालीन ब्रिटिश सरकारने नेवाळी येथील १६०० एकर जागा ताब्यात घेतली, त्यावेळच्या आदेशात युद्ध समाप्तीनंतर सहा महिन्यांत जमीन परत करण्यात येईल, असे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, आज सात दशकांनंतरही शेतकऱ्यांना जमीन मिळालेली नाही. सरकार नुकसान भरपाई दिल्याचा दावा करते, मात्र संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नाहीत. जून महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी शेतकऱ्यांना दोन-तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागला. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची भाषा सरकार करत असताना शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी तुरुंगात जावं लागत असेल, तर ते दुर्दैवी आहे, असे खा. डॉ. शिंदे म्हणाले. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत करावी किंवा सध्याच्या कायद्यानुसार आजच्या बाजारभावाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली. तसेच, मध्यममार्ग म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात राज्य शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध करून द्यावी, असा तोडगाही खा. डॉ. शिंदे यांनी मांडला. या कायद्यातील सुधारणेमुळे या शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणे