शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नव्या कळवा खाडीपुलामुळे वाहतूक कोंडीत पडणार भर चिंचोळ््या बोगद्याचा परिणाम : घोडबंदर रोडची होणारा पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:21 IST

कळवा खाडीवरील नव्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणी हा पुल खाली उतरविण्यात आला आहे. तेथून हाकेच्या अंतरावर विटावा सबवे असून तो अतिशय चिंचोळा असल्याने या ठिकाणी पुन्हा कोंडी फुटण्याऐवजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपुलाचा मार्ग वाढविण्याची मागणीवाहनांची वर्दळ अधिक संख्येने वाढणार

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या  तिसऱ्या पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढला जावा, अशी आशा व्यक्त होत आहे.                    मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या  पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसऱ्या  पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.          जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसऱ्या पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. तसेच आता यात थोडा बदल करण्यात आला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.केबल स्टेड टाईपचा हा पूल असणार असून तो दीड कि.मी. लांबीचा असणार आहे. यामुळे विटाव्या पुलाखालील आणि कळवा नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी फुटणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.       आजच्या घडीला या मार्गावरुन विटावा नवी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या ही दिवसाला ५० ते ६० हजारांच्या आसपास आहे. ऐरोली मार्गे जावे लागल्यास त्या ठिकाणी दोन टोल भरावे लागत आहेत. त्यामुळे भविष्यात या फ्रीवेचाच वापर अधिक होणार आहे. नवा ब्रीज सुरु झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवा ब्रीज हा कळवा हॉस्पिटलच्या ठिकाणी उतरवण्यात येणार असून तेथून पुढे विटाव्या पुलाचा चिंचोळा मार्ग आहे. या पुलावरुन येणारी वाहतुक येथे येऊन तिला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या नव्या पुलावरुन आतापासूनच तर्कविर्तक केले जाऊ लागले आहेत. घोडबंदर मार्गावर रस्ते चार पदरी असतांना या ठिकाणी जेथे पूल खाली उतरतात, त्याठिकाणी वाहतूक कोंडी होतांना दिसते. भविष्यात या नव्या पुलामुळे हीच परिस्थितीत विटावा बोगद्याजवळ उदभवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाkalwaकळवा