शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

गरीब कल्याण योजनेचे फलित गुलदस्त्यात

By admin | Updated: December 29, 2016 02:55 IST

बेहिशेबी रोकड आणि अनामत रक्कम जाहीर करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फलित स्पष्ट करण्याबाबत प्राप्तीकर विभागाने असमर्थता

ठाणे : बेहिशेबी रोकड आणि अनामत रक्कम जाहीर करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फलित स्पष्ट करण्याबाबत प्राप्तीकर विभागाने असमर्थता व्यक्त केली. या योजनेविषयी अगोदरच सर्वश्रुत असलेली माहिती देऊन प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेची औपचारिकता पार पाडली.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना १७ डिसेंबर २०१६ रोजी जाहीर झाली. ३१ मार्च २०१७ पर्यंत ती लागू असेल. या योजनेबाबत माहिती देण्यासाठी प्राप्तीकर विभागाने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. प्राप्तीकर विभागाचे मुख्य आयुक्त ए.सी. शुक्ला यांनी या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पत्रकारांना सांगितली. योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत असली तरी या योजनेंतर्गत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा केवळ ३० डिसेंबरपर्यंतच भरता येणार असल्याचे ते म्हणाले. १७ डिसेंबरपासून आतापर्यंत या योजनेंतर्गत किती व्यापाऱ्यांनी बेहिशेबी रकमेचा भरणा केला, या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. किती रुपयांचा भरणा या योजनेंतर्गत झाला, याचीही माहिती ते देऊ शकले नाहीत. एवढेच काय, या योजनेस आतापर्यंत कसा प्रतिसाद मिळाला, याबाबतही बोलण्यास त्यांनी नकार दिला. एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने किंवा नेत्याने गैरमार्गाने जमा केलेली रोकड नातलगाच्या नावे जाहीर केली, तर असे प्रकरण नेमके कसे हाताळले जाईल, यावरही ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. बेहिशेबी रक्कम जाहीर करण्यासाठी ही योजना अतिशय चांगली असून, अशी रक्कम जाहीर करणाऱ्यास किती कर आणि दंड भरावा लागेल, याबाबत त्यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)३० डिसेंबरपर्यंत स्वीकारणार जुन्या नोटापत्रकार परिषदेपूर्वी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाण्यातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना योजनेची विस्तृत माहिती दिली. या योजनेंतर्गत पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.प्राप्तीकर विभागाचे मुख्य आयुक्त ए.सी. शुक्ला, प्रधान आयुक्त एस.पी. गुप्ता, ठाणे जिल्हा व्यापारी मंडळाचे नानजीभाई ठक्कर, महावीर जैन तसेच चार्टर्ड अकाउंटंट संघटनेसह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या योजनेंतर्गत बेहिशेबी रोकड जाहीर करणाऱ्यास ४९.९० टक्के रक्कम नापरतावा कर आणि दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार असून २५ टक्के रक्कम बँकेत ४ वर्षांसाठी बिनव्याजी ठेवावी लागणार आहे. योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत असून त्यानंतर कुणाकडे बेहिशेबी रोकड आढळल्यास ७७.२५ टक्के दंड भरावा लागेल. यादरम्यान प्राप्तीकर विभागाच्या सर्व्हेमध्ये कुणाकडे अशी रोकड आढळली, तर १०० टक्क्यांपेक्षाही जास्त दंडआकारणी होऊ शकते, असे मुख्य आयुक्तांनी सांगितले. ज्यांच्यावर भ्रष्टाचारासह अन्य गुन्हे दाखल आहेत, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. योजनेची वैशिष्ट्ये त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने विशद केली. या योजनेच्या नावातच गरीबांचे कल्याण समाविष्ट आहे. या योजनेतून जमा होणारा पैसा सरकार गरिबांसाठी वापरणार असल्याने याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.