शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

...तर सोसायटी होणार सील; कोरोना रोखण्यासाठी ठाण्यात सोसायट्यांवर घातली बंधने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:57 AM

मागील वर्षी ऑक्टोबरपासून कोरोनारुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात नव्याने कोरोनारुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिसांमार्फत कारवाईस सुरुवात केली आहे. शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पालिकेने आता विविध उपाय योजून  शहरातील सोसायट्यांवरदेखील बंधने लादून सूचना केल्या आहेत. तसेच ज्या झोपडपट्टीत रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी तापाच्या रुग्णांची पुन्हा पाहणी सुरू केली आहे. शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवरून २९७ दिवसांवर आला आहे. 

मागील वर्षी ऑक्टोबरपासून कोरोनारुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने महापालिकेने टप्प्याटप्प्याने वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते. परंतु, आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोनारुग्णांची संख्या वाढली. नागरिकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी करणे यामुळेदेखील ती वाढताना दिसू लागली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आता महापालिकेने  झोपडपट्टी भागात पुन्हा तापाच्या रुग्णांची पाहणी सुरू केली आहे.

त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण पुन्हा जास्त प्रमाणात आढळणाऱ्या भागात विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच सोसायट्यांनादेखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नवीनकोणीही सोसायटीत येऊ नये, सोसायटीच्या टेरेसवर, मोकळ्या जागांवर गर्दी होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, एखाद्या सोसायटीमध्ये जास्तीचे रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सील केली जाणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे; शिवाय अत्यावश्यक काम असेल तरच इतरांनी सोसायटी बाहेर जावे, असेही नमूद केले आहे.

ठाण्यात रोज साडेचार हजार कोरोना चाचण्याठाणे : ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत एकूण ६१ हजार ७४५ कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील ५८ हजार ८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एक हजार ३२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या  एक हजार ५५० एवढी आहे. विशेष म्हणजे मागील आठ दिवसांपूर्वी ही संख्या ८५० च्या घरात होती. सध्याच्या घडीला चार हजार ५०० टेस्ट रोज केल्या जात आहेत.त्यातून शुक्रवारी १८५ नव्या रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा काही दिवसांपूर्वी ३२३ दिवसांवर होता तो आता २९७ दिवसांवर आला आहे. याचाच अर्थ काही प्रमाणात का होईना पुन्हा धोका वाढण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या