शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:27 IST

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांची जबाबदारी त्यांचीच असल्याचे केडीएमसीने म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील खड्डेमय स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.केडीएमसी परिक्षेत्रात समावेश झालेल्या २७ गावांमधील एमआयडीसी निवासी भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलेल्या या विभागातील रहिवाशांचीही स्थिती ‘ना घरका ना घाटका’अशी झाली आहे. निवासी भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मागील पावसाळ्यात खडी आणि भुसा टाकून दोनदा खड्डे बुजविण्यात आले; मात्र पावसाच्या पाण्यात हा प्रयत्न वाहून गेला होता. पावसाळ्यानंतरही खड्डे कायम राहिल्याने खड्ड्यांतून वाहने गेल्यावर उडणाऱ्या धुळीचा त्रास येथील नागरिकांना होत आहे.दरम्यान, खड्डेमय रस्त्यांसह अन्य नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. यासंदर्भात मध्यंतरी निवासी भागातील महिलांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. तेव्हा केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने करण्याचे आश्वासन दिले होते.खोदकामच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून केले तीन रस्तेकेडीएमसीत निवासी भागाचा समावेश झाल्याने तेथील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे बोलले जात आहे; मात्र एमआयडीसीने पुढाकार घेत नुकतीच तीन रस्त्यांची दुरुस्ती केली. सर्विस रोड, मॉडेल कॉलेज परिसरातील भाजी गल्ली, मिलापनगर तलाव रोड यांचा समावेश आहे. एमआयडीसी परिसरात अन्य प्राधिकरणांनी केलेल्या खोदकामाच्या बदल्यात वसूल केलेल्या पैशातून ही कामे करण्यात आली आहेत. पण उर्वरित रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीचीच आहे, असे एमआयडीसीने म्हटले आहे. तर दुसरीकडे निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी एमआयडीसीचीच असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाही या दोघांच्या वादात खड्ड्याचा प्रश्न कायम राहण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली