शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कल्याण परिमंडळात ६० हजार ७०० ग्राहकांच्या शंकांचे निवारण; हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:26 IST

कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली जाईल.

डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडळात अधिक वीजबिलाबाबत तक्रारी घेऊन आलेल्या ६० हजार ७०० ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले असून शंका समाधान झाल्यानंतर ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वाढत आहे.

लॉकडाऊननंतर प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रिडींग व ग्राहकांच्या वीज वापरानुसार तीन महिन्यांचे एकत्रित व अचूक वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यास जूनपासून सुरुवात झाली. त्यानंतर अधिक वीजबिलाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या शंका समाधानासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. कल्याण परिमंडळातील कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, बदलापूर, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, वसई, वाडा, आचोळे, विरार, नालासोपारा, बोईसर, डहाणू, जव्हार, पालघर, मोखाडा, सफाळे, विक्रमगड, तलासरी आदी सर्वच ४० उपविभागीय कार्यालयांकडून ४० वेबिनार, १० ग्राहक मेळावे व खुले चर्चासत्र, नोंदणीकृत मोबाईल, 'एसएमएस', व्हॉट्स अँप व प्रत्यक्ष संवादाद्वारे ग्राहकांना गेल्या तीन आठवड्यांपासून वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे.

कल्याण परिमंडलात आतापर्यंत ६० हजार ८७४ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून हप्त्यांवर व्याजाची आकारणी नाही तीन महिन्यांचे वीजबिल मुदतीत व एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना २ टक्के सवलत देण्यात येणार असून ही सवलत जुलै महिन्याच्या वीजबिलात समायोजित केली जाईल. तर तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण रकमेच्या एक तृतीयांश रक्कम भरणे आवश्यक आहे. उर्वरित रकमेवर व्याजाची आकारणी करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण