शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

झाडे रुजवण्याचा संकल्प

By admin | Updated: June 5, 2016 03:09 IST

वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या

ठाणे : वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील विविध पर्यावरणवादी संस्थांनी यंदा रोपांपेक्षा बियांच्या लागवडीवर भर देण्याचे ठरवले आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात रोपांची लागवड केली तर त्यांची जोपासना-संगोपन त्रासाचे ठरते. शिवाय अजून पावसाला सुरूवात झालेली नसल्याने रोपांनी मूळ धरमेही कठीण असते. त्यामुळे बियांची लागवड करत झाडे लावण्याची कल्पना मूळ धरावी आणि त्यातून पर्यावरण जतनाचा संदेश सर्वदूर पोचावा हा उद्देश त्यामागे आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावणे, दिंड्या काढणे असे पर्यावरणाभिमुख उपक्रम सर्रास राबविले जातात. मात्र हरीत ठाण्यासाठी रोपे बनविणे, बियाणे रूजविणे आणि रोपटी लावणे हे काम गेली वर्षानुवर्षे सुरू ठेवले आहे ते ठाण्यातील हरियाली संस्थेने. नवी मुंबईतील तळोजा येथे रविवारी हरियालीच्याच मार्गदर्शनाखाली बियाणे रूजविण्यात येणार आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पाहता वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ठाण्यात हरियाली संस्था २० वर्षापासून काम करत आहे. कासारवडवली येथील नर्सरीत, मुलुंड येथील नर्सरीत रोपे बनविण्याचे काम केले जाते, तर घोडबंदर येथील मुंदा डोंगरावर बियाणे रूजविण्यात येते. विशेष म्हणजे हरियालीचे काम पाहता ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीतील नागरिकांनीही हरियालीच्या सहकार्याने रोपे बनविण्याचे काम सुरू केले असून पाच हजाराहून अधिक रोपे तयारही झाली आहेत. त्याचबरोबर गांडूळ आणि जैविक खत बनविण्याचेही दोन प्रकल्प तेथे उभे राहिले आहेत. ही रोपे पहिला पाऊस पडल्यावर ठाण्यातील विविध डोंगराळ भागात लावली जातात. काही रोपे नागरिकांना विनामूल्यही दिली जातात, अशी माहिती हरियालीचे संस्थापक, अध्यक्ष पूनम सिंघवी यांनी दिली. (प्रतिनिधी)३० हजार झाडे बहरलीमुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीनजीक असलेल्या लोनाड-भवाळे गावाजवळील डोंगरावरील २५ एकर जमिनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट हरियालीने ठेवले होते. २००८ ते २०१५ या सात वर्षात या डोंगरावर सुमारे ३० हजार झाडे लावून हिरवळ निर्माण केली आणि आता तो डोंगर पुन्हा वनविभागाकडे सुपूर्द केला आहे.