शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

झाडे रुजवण्याचा संकल्प

By admin | Updated: June 5, 2016 03:09 IST

वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या

ठाणे : वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील विविध पर्यावरणवादी संस्थांनी यंदा रोपांपेक्षा बियांच्या लागवडीवर भर देण्याचे ठरवले आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात रोपांची लागवड केली तर त्यांची जोपासना-संगोपन त्रासाचे ठरते. शिवाय अजून पावसाला सुरूवात झालेली नसल्याने रोपांनी मूळ धरमेही कठीण असते. त्यामुळे बियांची लागवड करत झाडे लावण्याची कल्पना मूळ धरावी आणि त्यातून पर्यावरण जतनाचा संदेश सर्वदूर पोचावा हा उद्देश त्यामागे आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावणे, दिंड्या काढणे असे पर्यावरणाभिमुख उपक्रम सर्रास राबविले जातात. मात्र हरीत ठाण्यासाठी रोपे बनविणे, बियाणे रूजविणे आणि रोपटी लावणे हे काम गेली वर्षानुवर्षे सुरू ठेवले आहे ते ठाण्यातील हरियाली संस्थेने. नवी मुंबईतील तळोजा येथे रविवारी हरियालीच्याच मार्गदर्शनाखाली बियाणे रूजविण्यात येणार आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पाहता वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ठाण्यात हरियाली संस्था २० वर्षापासून काम करत आहे. कासारवडवली येथील नर्सरीत, मुलुंड येथील नर्सरीत रोपे बनविण्याचे काम केले जाते, तर घोडबंदर येथील मुंदा डोंगरावर बियाणे रूजविण्यात येते. विशेष म्हणजे हरियालीचे काम पाहता ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीतील नागरिकांनीही हरियालीच्या सहकार्याने रोपे बनविण्याचे काम सुरू केले असून पाच हजाराहून अधिक रोपे तयारही झाली आहेत. त्याचबरोबर गांडूळ आणि जैविक खत बनविण्याचेही दोन प्रकल्प तेथे उभे राहिले आहेत. ही रोपे पहिला पाऊस पडल्यावर ठाण्यातील विविध डोंगराळ भागात लावली जातात. काही रोपे नागरिकांना विनामूल्यही दिली जातात, अशी माहिती हरियालीचे संस्थापक, अध्यक्ष पूनम सिंघवी यांनी दिली. (प्रतिनिधी)३० हजार झाडे बहरलीमुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीनजीक असलेल्या लोनाड-भवाळे गावाजवळील डोंगरावरील २५ एकर जमिनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट हरियालीने ठेवले होते. २००८ ते २०१५ या सात वर्षात या डोंगरावर सुमारे ३० हजार झाडे लावून हिरवळ निर्माण केली आणि आता तो डोंगर पुन्हा वनविभागाकडे सुपूर्द केला आहे.