शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झाडे रुजवण्याचा संकल्प

By admin | Updated: June 5, 2016 03:09 IST

वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या

ठाणे : वन्यप्राण्यांच्या जतन-संवर्धनावर भर देत त्यांच्यासाठी पोषक पर्यावरण तयार करणे, त्यांच्या तस्करीला विरोध करण्यावर यंदाच्या पर्यावरण दिनी भर दिला जाणार असला, तरी ठाणे आणि आसपासच्या परिसरातील विविध पर्यावरणवादी संस्थांनी यंदा रोपांपेक्षा बियांच्या लागवडीवर भर देण्याचे ठरवले आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात रोपांची लागवड केली तर त्यांची जोपासना-संगोपन त्रासाचे ठरते. शिवाय अजून पावसाला सुरूवात झालेली नसल्याने रोपांनी मूळ धरमेही कठीण असते. त्यामुळे बियांची लागवड करत झाडे लावण्याची कल्पना मूळ धरावी आणि त्यातून पर्यावरण जतनाचा संदेश सर्वदूर पोचावा हा उद्देश त्यामागे आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावणे, दिंड्या काढणे असे पर्यावरणाभिमुख उपक्रम सर्रास राबविले जातात. मात्र हरीत ठाण्यासाठी रोपे बनविणे, बियाणे रूजविणे आणि रोपटी लावणे हे काम गेली वर्षानुवर्षे सुरू ठेवले आहे ते ठाण्यातील हरियाली संस्थेने. नवी मुंबईतील तळोजा येथे रविवारी हरियालीच्याच मार्गदर्शनाखाली बियाणे रूजविण्यात येणार आहे.पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पाहता वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी ठाण्यात हरियाली संस्था २० वर्षापासून काम करत आहे. कासारवडवली येथील नर्सरीत, मुलुंड येथील नर्सरीत रोपे बनविण्याचे काम केले जाते, तर घोडबंदर येथील मुंदा डोंगरावर बियाणे रूजविण्यात येते. विशेष म्हणजे हरियालीचे काम पाहता ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली सोसायटीतील नागरिकांनीही हरियालीच्या सहकार्याने रोपे बनविण्याचे काम सुरू केले असून पाच हजाराहून अधिक रोपे तयारही झाली आहेत. त्याचबरोबर गांडूळ आणि जैविक खत बनविण्याचेही दोन प्रकल्प तेथे उभे राहिले आहेत. ही रोपे पहिला पाऊस पडल्यावर ठाण्यातील विविध डोंगराळ भागात लावली जातात. काही रोपे नागरिकांना विनामूल्यही दिली जातात, अशी माहिती हरियालीचे संस्थापक, अध्यक्ष पूनम सिंघवी यांनी दिली. (प्रतिनिधी)३० हजार झाडे बहरलीमुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीनजीक असलेल्या लोनाड-भवाळे गावाजवळील डोंगरावरील २५ एकर जमिनीवर झाडे लावण्याचे उद्दिष्ट हरियालीने ठेवले होते. २००८ ते २०१५ या सात वर्षात या डोंगरावर सुमारे ३० हजार झाडे लावून हिरवळ निर्माण केली आणि आता तो डोंगर पुन्हा वनविभागाकडे सुपूर्द केला आहे.